मुख्यमंत्री ‘व्होट बँके’चं राजकारण करताहेत; काँग्रेस नेत्याचं राज्यपालांना पत्र
साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर शिवसेनेनं परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित केला, तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्र’वार’ बघायला मिळालं. दरम्यान, राज्यातील महिलांवरील वाढत्या घटनांवरून काँग्रेसच्या नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य विश्वबंधू राय यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात साकीनाका बलात्कार घटनेबद्दल […]
ADVERTISEMENT

साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर शिवसेनेनं परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित केला, तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्र’वार’ बघायला मिळालं. दरम्यान, राज्यातील महिलांवरील वाढत्या घटनांवरून काँग्रेसच्या नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य विश्वबंधू राय यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात साकीनाका बलात्कार घटनेबद्दल भाष्य केलेलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांबद्दल चर्चा करण्यासाठी अधिवेशन बोलवण्याच्या राज्यपालांच्या मागणीचंही समर्थन केलं आहे.
राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात काय म्हटलंय?
मा. भगतसिंह कोश्यारीजी