भारतात कोरोनाचं संकट कायम; 24 हजार रुग्ण सक्रिय, महाराष्ट्रात नवीन व्हेरिएंटच्या शिरकावामुळे चिंता

मुंबई तक

भारतात कोरोनाचं संकट कायम आहे. सध्या देशात एकूण सक्रिय रूग्णांची संख्या पाहिली तर ती 24 हाजार इतकी आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळीपूर्वी गेल्या तीन दिवसांपासून देशात कोरोनाचे 2000 हून अधिक नवीन रुग्ण समोर आले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत देशातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये थोडीशी घट झाली आहे. मागच्या 24 तासात 2 हजारपेक्षा जास्त रुग्ण अढळले केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारतात कोरोनाचं संकट कायम आहे. सध्या देशात एकूण सक्रिय रूग्णांची संख्या पाहिली तर ती 24 हाजार इतकी आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळीपूर्वी गेल्या तीन दिवसांपासून देशात कोरोनाचे 2000 हून अधिक नवीन रुग्ण समोर आले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत देशातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये थोडीशी घट झाली आहे.

मागच्या 24 तासात 2 हजारपेक्षा जास्त रुग्ण अढळले

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना व्हायरस संसर्गाची 2112 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि गेल्या 24 तासात 4 मृत्यू झाले आहेत. एका दिवसापूर्वी, देशात 2119 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, तर 10 मृत्यू झाल्याची नोंद देखील आहे. आता, भारतात कोरोना महामारी सुरू झाल्यापासून, या विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 4,46,40,748 वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या 5,28,957 वर गेली आहे.

इतक्या लोकांनी घेतली लस

आता देशातील रिकव्हरी रेट 98.76 टक्के झाला आहे. त्याच वेळी, सक्रिय प्रकरणांमध्ये एकूण संसर्गाच्या 0.05 टक्के समावेश होतो. आतापर्यंत कोरोनाविरोधी लसीकरणाचा आकडा 219 कोटी 53 लाख, 88 हजार 326 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 2 लाख 90 हजार 752 जणांना कोरोनाची लस घेतली आहे.

नवीन व्हेरिएंटच्या प्रवेशामुळे चिंता वाढली

देशात सणांचा हंगाम शिगेला पोहोचला आहे. कोरोनाचा काळ आणि लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच लोक अनेक बंधनांशिवाय दिवाळी साजरी करण्याच्या मूडमध्ये आहेत. अशा परिस्थितीत बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी असते, मात्र देशात करोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या प्रवेशामुळे चिंता वाढली आहे. यापैकी, BQ.1 आणि XBB रूपे प्रमुख आहेत. निष्काळजीपणा टाळण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp