महाराष्ट्रातील ‘या’ पाच जिल्ह्यात कोरोना पसरतोय हातपाय!
मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (21 फेब्रुवारी) व्हीसीच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली आहे. एवढंच नव्हे तर राज्यात अशीच रुग्णसंख्या वाढत राहिल्यास लॉकडाऊन देखील करावं लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. यावरुनच राज्यात कोरोनासंदर्भातील परिस्थिती गंभीर असल्याचं […]
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (21 फेब्रुवारी) व्हीसीच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली आहे. एवढंच नव्हे तर राज्यात अशीच रुग्णसंख्या वाढत राहिल्यास लॉकडाऊन देखील करावं लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. यावरुनच राज्यात कोरोनासंदर्भातील परिस्थिती गंभीर असल्याचं दिसून येत आहे. सध्या अमरावती, अकोला आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यात आणि विशेषत: येथील शहरी भागात कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं दिसत आहे. मात्र, याशिवाय राज्यात असे पाच जिल्हे कोणते आहेत की, जिथे आजही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 21,00,884 जणांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. ज्यापैकी 19,94,974 जण बरे झाले आहेत. तर 51,788 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात एकूण 52,956 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. साधारण दोन महिन्यात राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याचं दिसत होतं पण मागील तीन-चार दिवस मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यातही अमरावती, यवतमाळ येथील रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहेत.
गेल्या काही दिवसात लग्न समारंभ, बाजार, मॉलमधली गर्दी वाढतच आहे. परिणामी आता कोरोनाने राज्यात पुन्हा मान वर काढली आहे आणि पुन्हा आपल्या डोक्यावर लॉकडाऊनची टांगती तलवार आहे. त्यामुळे आता राज्यातले कोणते जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेत ते जाणून घेऊया.
नक्की वाचा: ‘..पुन्हा लॉकाडऊन परवडणार नाही’ राजेश टोपेंचं महाराष्ट्राला पत्र










