उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आदित्य ठाकरेंचा ‘मुख्यमंत्री’ असा उल्लेख, स्पष्टीकरण देत म्हणाले…

मुंबई तक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलत असताना लॉकडाऊन लागेल का ? असा प्रश्न विचारला असता त्याबाबत अंतिम काय तो निर्णय आहे तो मुख्यमंत्री आदित्य ठाकरे घेतील असं वक्तव्य केलं. उपमुख्यमंत्री यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख मुख्यमंत्री असा केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी तातडीने स्पष्टीकरण देत आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत. मी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलत असताना लॉकडाऊन लागेल का ? असा प्रश्न विचारला असता त्याबाबत अंतिम काय तो निर्णय आहे तो मुख्यमंत्री आदित्य ठाकरे घेतील असं वक्तव्य केलं. उपमुख्यमंत्री यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख मुख्यमंत्री असा केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी तातडीने स्पष्टीकरण देत आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत. मी आदित्य ठाकरे हे जे म्हणालो ते वक्तव्य मागे घेतो मला उद्धव ठाकरे निर्णय घेतील असं म्हणायचं होतं असं त्यांनी म्हटलं आहे.

नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यातला संघर्ष
नेमका कधी आणि कसा सुरू झाला?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील आणि पुण्यातील कोरोना परिस्थितीबाबत भाष्य केलं. राज्य सरकारने जी नियमावली तयार केली आहे त्यात कोणताही बद केला गेलेला नाही. कोरोना रूग्ण वाढत आहेत मात्र कोरोना रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे आपण रात्रीची संचारबंदी ठेवली आहे. जर कोरोना रूग्णांची जास्त वाढली आणि रूग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण वाढलं ऑक्सिजनचा वापर वाढला तर त्या अनुषंगाने निर्णय घ्यावा लागेल.

हे वाचलं का?

    follow whatsapp