जिच्यावर विश्वास ठेवला, तिनेच पाठीत खंजीर खुपसला; मोलकरणीने मालकीणीला का संपवलं?

मुंबई तक

Crime News : सोन्या-चांदीच्या दागिन्यांसाठी 15 वर्षांचा विश्वास तोडत एका महिलेने आपल्या मालकिणीची निर्घृण हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

जिच्यावर विश्वास ठेवला, तिनेच पाठीत खंजीर खुपसला;

point

मोलकरणीने मालकीणीला का संपवलं?

Crime News : एका महिलेने केवळ संपत्तीच्या आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी आपल्याच मालकीण असलेल्या महिलेची निर्घृण हत्या केली. रेखा राठोड असे आरोपी महिलेचे नाव असून तिने शांतीबेन आकेडीवाला यांचा विश्वास संपादन करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढले होते. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन कुटुंबांमध्ये अत्यंत जवळचे संबंध होते, मात्र या मैत्रीच्या आड रेखाचा हेतू अत्यंत भयानक होता. पालनपूरच्या चाणक्यपुरी सोसायटीत राहणाऱ्या शांतीबेन यांचा मृतदेह एका गोणीत भरून नाल्यात फेकण्यात आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूरमधून माणुसकीला काळीमा फासणारी ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

15 वर्षांचा जुना संबंध आणि पैशांचा हव्यास

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रेखा राठोड ही गेल्या 15 वर्षांपासून शांतीबेन यांच्या कुटुंबाच्या संपर्कात होती. ती केवळ त्यांच्या घरची कामेच करत नव्हती, तर स्वयंपाकाची जबाबदारीही सांभाळत असे, ज्यामुळे कुटुंबाचा तिच्यावर आंधळा विश्वास होता. रेखा हनुमान टेकरी परिसरात फर्निचरचा व्यवसाय देखील करत होती. साधारण 1 वर्षापूर्वी शांतीबेन यांनी अडचणीच्या काळात रेखाला मदतीचा हात म्हणून आपले सोन्या-चांदीचे दागिने आणि काही रोकड दिली होती. मात्र, जेव्हा शांतीबेन यांनी आपली ही ठेव परत मागण्यास सुरुवात केली, तेव्हा रेखावर दबाव वाढू लागला. दिलेले दागिने परत करण्याऐवजी त्यांचा कायमचा काटा काढण्याचे क्रूर नियोजन रेखाने आपल्या साथीदारांच्या मदतीने केले.

हेही वाचा : पत्नीचा मर्डर केल्याने वडील तुरुंगात; ज्याच्याकडे आश्रयासाठी गेली त्या मामानेच केला भाचीवर बलात्कार

निर्घृण हत्या आणि पुराव्यांची विल्हेवाट

22 March च्या रात्री साधारण 8 वाजता शांतीबेन रेखाच्या फर्निचरच्या दुकानात पोहोचल्या होत्या. तिथे त्यांच्यावर काय संकट ओढवणार आहे याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती. शांतीबेन दुकानात येताच रेखा राठोड आणि तिच्या 3 साथीदारांनी मिळून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की शांतीबेन यांचा जागीच मृत्यू झाला. आपला गुन्हा लपवण्यासाठी आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने शांतीबेन यांचा मृतदेह एका गोणीत भरला आणि तो एका निर्जन भागातील नाल्यात फेकून दिला. या घटनेनंतर शांतीबेन बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होताच पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि या भीषण हत्याकांडाचा उलगडा झाला.

हे वाचलं का?