अधिवेशन गाजवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची गोष्ट!

मुंबई तक

महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अवघ्या दहा दिवसात संपलं. मात्र ते गाजवलं फक्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच. विविध मुद्द्यांवरून सरकारला लक्ष्य करत आणि अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडत देवेंद्र फडणवीस यांनी पुरावे दाखवत आरोपांच्या फैरी झाडल्या. पूजा चव्हाण मृत्यू, कोरोनामधला भ्रष्टाचार, वीज बिल प्रश्न, शेतकऱ्यांची कर्जमाफी, अँटेलियाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडण्याचं प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अवघ्या दहा दिवसात संपलं. मात्र ते गाजवलं फक्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच. विविध मुद्द्यांवरून सरकारला लक्ष्य करत आणि अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडत देवेंद्र फडणवीस यांनी पुरावे दाखवत आरोपांच्या फैरी झाडल्या.

पूजा चव्हाण मृत्यू, कोरोनामधला भ्रष्टाचार, वीज बिल प्रश्न, शेतकऱ्यांची कर्जमाफी, अँटेलियाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडण्याचं प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू आणि सचिन वाझेंच्या विरोधात वाचून दाखवलेले पुरावे या सगळ्यामुळेच हे अधिवेशन वादळी ठरलं.

८ मार्चचा दिवस सोडला तर असा एकही दिवस गेला नाही की त्यादिवशी देवेंद्र फडणवीस यांची चर्चा नव्हती. ठाकरे सरकारपेक्षाही चर्चा झाली ती विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचीच. ते उत्तम प्रकारे वाद-प्रतिवाद कसे करू शकतात आणि सरकारची कशी कोंडी करू शकतात याचाच प्रत्यय अधिवेशनात आला.

हे वाचलं का?

    follow whatsapp