बाबासाहेब पुरंदरे: ‘जाणता राजा’ कसं घडलं?, जाणून घ्या त्यामागची इंटरेस्टिंग कथा
पुणे: पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं सोमवारी (15 नोव्हेंबर) पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. बाबासाहेबांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींपासून अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. याचसोबत अनेकांनी त्यांच्या जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे. यामध्ये काही जणांनी ‘जाणता राजा’ हे भव्य दिव्य नाटक नेमकं कसं घडलं याविषयी देखील सांगितलं. बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजा […]
ADVERTISEMENT

पुणे: पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं सोमवारी (15 नोव्हेंबर) पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. बाबासाहेबांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींपासून अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. याचसोबत अनेकांनी त्यांच्या जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे. यामध्ये काही जणांनी ‘जाणता राजा’ हे भव्य दिव्य नाटक नेमकं कसं घडलं याविषयी देखील सांगितलं.
बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजा हे नाटक ज्या भव्यतेने सर्वांसमोर आणलं त्या पद्धतीने आजतागायत कोणालाही नाटकाची बांधणी करता आलेली नाही. शेकडो नटांचा ताफा आणि सजीव प्राण्यांच्या मदतीने बाबासाहेबांनी एका भव्यदिव्य नाटकाची निर्मिती केली. पण या नाटकाच्या निर्मितीचा प्रवास फारच कठीण होता. बाबासाहेबांच्यासोबत तब्बल 56 वर्ष काम करणाऱ्या दिवाकर पांडे यांनी या नाटकाची नेमकी कथा सांगितली आहे.
अशी झाली ‘जाणता राजा’ची निर्मिती
छत्रपती शिवाजी महाराजांवर एक भव्यदिव्य नाटकाची निर्मिती करावी अशी बाबासाहेबाची इच्छा होता. त्यामुले सगळ्यात आधी ते इंग्लंडला गेले. त्यावेळी त्यांनी तिथली काही नाटकं पाहिली. त्या नाटकांवरुन त्यांनी स्फूर्ती घेतली, अशा प्रकारची भव्य-दिव्य नाटकं आपल्याकडे झाली पाहिजेत. ज्यामध्ये जिवंत प्राणी स्टेजवर वापरुन त्यांचा प्रत्यक्ष देखावा निर्माण करावा हे त्यांच्या मनात होतं.