ठाकरे सरकार पाडण्यासाठी धमकी देण्यात आली होती, संजय राऊतांच्या ‘लेटरबॉम्ब’ने खळबळ

मुंबई तक

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी मला धमकी देण्यात आली होती. तसंच मी जर ऐकलं नाही तर तुमचा लालूप्रसाद यादव करू असंही मला धमकावण्यात आलं होतं. साधारण महिन्याभरापूर्वी ही घटना घडली असा लेटरबॉम्ब आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टाकला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी मला धमकी देण्यात आली होती. तसंच मी जर ऐकलं नाही तर तुमचा लालूप्रसाद यादव करू असंही मला धमकावण्यात आलं होतं. साधारण महिन्याभरापूर्वी ही घटना घडली असा लेटरबॉम्ब आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टाकला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात ईडीसारख्या तपासयंत्रणांचा कसा गैरवापर केला जातो याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच पत्रात त्यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे.

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मला धमकी देण्यात आली. सुमारे महिन्याभरापूर्वी हा प्रकार घडला होता. महाराष्ट्रातलं सरकार पडलं की मध्यावधी निवडणुका लागतील. तसंच मी जर ऐकलं नाही तर तुमची अवस्था लालूप्रसाद यादव यांच्यासारखी केली जाईल अशी धमकीही देण्यात आली. मी जर या सगळ्याला नकार दिला तर मला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल असंही धमकावण्यात आलं. एवढंच नाही तर महाराष्ट्रातले दोन बडे मंत्रीही खडी फोडायला जाणार आहेत असंही धमकावण्यात आलं. मी या सगळ्याला भीक घातलेली नाही असं संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp