Exclusive : नागालँडमध्ये राष्ट्रवादी BJP सोबत; महाराष्ट्रात ‘मविआ’ फुटणार?

मुंबई तक

कोहिमा : सत्ताधारी आघाडीकडे पूर्ण बहुमत असताना आणि स्वतःकडे विरोधी पक्षात बसण्याची संधी असताना देखील राष्ट्रवादीने सत्ताधारी एनडीपीपी (NDPP) आणि भाजप (BJP) आघाडीला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीने (NCP) अचानक घेतलेल्या या भूमिकेने नागालँडसह (Nagaland) महाराष्ट्रात (Maharashtra) मोठी खळबळ उडाली आहे. नागालँडमध्ये घेतलेल्या भूमिकेचे आता महाराष्ट्रात काय परिणाम होणार? महाराष्ट्रातही राष्ट्रवादीचा भाजपसोबत जाण्याचा इरादा आहे का? […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोहिमा : सत्ताधारी आघाडीकडे पूर्ण बहुमत असताना आणि स्वतःकडे विरोधी पक्षात बसण्याची संधी असताना देखील राष्ट्रवादीने सत्ताधारी एनडीपीपी (NDPP) आणि भाजप (BJP) आघाडीला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीने (NCP) अचानक घेतलेल्या या भूमिकेने नागालँडसह (Nagaland) महाराष्ट्रात (Maharashtra) मोठी खळबळ उडाली आहे. नागालँडमध्ये घेतलेल्या भूमिकेचे आता महाराष्ट्रात काय परिणाम होणार? महाराष्ट्रातही राष्ट्रवादीचा भाजपसोबत जाण्याचा इरादा आहे का? महाविकास आघाडी फुटणार का? असे काही सवाल विचारले जात आहेत. (In Nagaland, the NCP has decided to support the ruling NDPP-BJP alliance instead of opposing it.)

याबद्दलच ‘मुंबई तक’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये राष्ट्रवादीचे नागालँडचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा का दिला?

प्रादेशिक स्तरावर बरीच समीकरण असतात. आमच्या निवडून आलेल्या सात आमदारांशी माझी चर्चा झाली. यात ईशान्येतील राज्यांपैकी नागालँड सर्वात पिछाडीवरील राज्य आहे. नागालँडमध्ये बरेच प्रश्न आहेत. या सगळ्या आमदारांनी थेट भाजपच्या उमेदवरांचा पराभव केला आहे. आमचा ज्या पाच ठिकाणी पराभव झालेला आहे तिथही विरोधात भाजपच होता. पण त्यानंतरही आम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आम्ही नागालँडच्या विकासाच्या भूमिकेतून घेतला आहे. यामागे काही स्थानिक समीकरण असतात. आमदारांची विकास काम असतात आणि आम्ही एनडीपीपी यांच्या नेतृत्वात काम करणार आहोत.

Nagaland : भाजप-राष्ट्रवादी एकत्र; विरोधक नसलेलं नवं सरकार कसं आहे?

हे वाचलं का?

    follow whatsapp