काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा हैदोस! चकमकीत पाच जवान शहीद

मुंबई तक

गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात हैदोस घातला असून, आज झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील पाच जवान शहीद झाले आहेत. घुसखोरी रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान जवान आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री झाली. यात पाच जवानांना वीर मरण आलं. (1 JCO along with 4 soldiers lost their life during counter terror operation In Poonch sector) दहशतवादी वास्तव्याला असल्याची माहिती […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात हैदोस घातला असून, आज झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील पाच जवान शहीद झाले आहेत. घुसखोरी रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान जवान आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री झाली. यात पाच जवानांना वीर मरण आलं. (1 JCO along with 4 soldiers lost their life during counter terror operation In Poonch sector)

दहशतवादी वास्तव्याला असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने घुसखोरी विरोधी मोहीम सुरू केली होती. पुंछ सेक्टरमध्ये असलेल्या डीकेजीमधील सुरणकोटजवळ असलेल्या गावात सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. तीन ते चार दहशतवादी असलेल्याची माहिती असल्यानं परिसराला लष्कराने वेढा दिला होता.

यावेळी दहशतवादी आणि जवानांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. या गोळीबारात लष्कराचे पाच जवान धारातीर्थी पडले. यात एक ज्युनिअर कमिशन ऑफिसर असून, चार जवान आहेत, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

चकमकीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि लष्कराच्या जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर संपूर्ण परिसराला वेढा देण्यात आला असून, दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp