झेंडे अन् भोंगे… जोधपूरमध्ये का उडाला हिंसेचा भडका?, ईदच्या पूर्वसंध्येला काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राजस्थानातील जोधपूर शहरात ईदच्या पूर्वसंध्येला दोन समुदायामध्ये हिंसक झडप झाली. पोलिसांनी आणि प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून समाजकंटकांना पांगवले आणि शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. रात्रभर शांतता होती, पण पहाट झाली आणि पुन्हा उद्रेक झाला. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले असून, अशोक गेहलोतांनी आपातकालीन बैठकही घेतली. त्यानंतर आता यावरून राजकारण तापलं आहे.

जोधपूरमधील हिंसेची सुरूवात झाली शहरातील जलोरी गेटपासून… येथे स्वातंत्र्यसेनानी बालमुकुंद बिस्सा चौक आहे. दोन दिवसांपूर्वी या चौकात परशुराम जयंतीच्या निमित्ताने भगवे झेंडे आणि बॅनर लावण्यात आले होते. याचदरम्यान ईदच्या पूर्वसंध्येला या चौकात चौहीबाजूने भोंगे लावले आणि मूर्तीलाच एक मोठा धार्मिक ध्वज लावला. आधीचे झेंडे काढून टाकण्यात आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भगवे झेंडे काढून टाकल्याची बातमी पसरताच दुसऱ्या गटाचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि चौकात चारही बाजूंनी लावलेले भोंगे हटवू लागले. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावरून वेगाने पसरले. त्यानंतर त्यानंतर दुसऱ्या गटाचे लोकही मोठ्या संख्येनं आले आणि वादाला सुरूवात झाली. वाद शिगेला पोहोचला आणि त्याच पर्यवसान दगडफेक आणि तोडफोडीत झालं.

ADVERTISEMENT

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन बाजूंचा जमाव हिंसक झालेला असल्यानं पोलिसांनी अश्रुधुरांचे नळकांडे फोडत बळाचा वापर केला. रात्री उशिरापर्यंत जमावाला पांगवण्याचं प्रयत्न पोलिसांकडून केले गेले. चौकांतून जमावाला पांगवल्यानंतर प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद केली.

ADVERTISEMENT

त्यानंतर रात्री उशिरा ईदगाह रोडवर मोठ्या संख्येनं शस्त्रांसह मोठा गट चौकात आला आणि पोलिसांवर दगडफेक करू लागला. पोलिसांनी अश्रुधुरांचे नळकांडे फोडत जमावाला पांगवलं. यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले.

रात्री झालेल्या या हिंसाचारानंतर सकाळी पुन्हा एकदा हिंसेचा भडका उडाला. ईदची नमाज अदा करण्यात आल्यानंतर अचानक दगडफेक सुरू झाली. सनीचर पोलीस ठाणे हद्दीत समाजकंटकांनी १५ ते २० चारचाकील वाहनांची तोडफोड केली. याचदरम्यान जलोरी गेट परिसरात जमा झालेल्या एका समुदायाला पोलिसांनी हुसकावून लावलं.

भाजप आमदाराच्या घराबाहेर जाळपोळ करण्यात आल्याची घटनाही घडली. भाजप आमदार व्यास यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या चारचाकी आणि दुचाकी पेटवून दिल्या. जोधपूरचे पोलीस उपायुक्तांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने जयपूरवरून अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुन्हे) रवी प्रकाश मेहरडा आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय अग्रवाल हे जोधपूरमध्ये आले होते.

राजस्थान पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे. जोधपूरमधील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लावण्यात आली आहे. ४ मेच्या मध्यरात्रीपर्यंत कर्फ्यू असणार आहे.

दरम्यान, जोधपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला राज्याच्या पोलीस महासंचालकांसह अनेक वरिष्ठ अधिकारी हजर होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT