महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? अजित पवारांचं साताऱ्यात सूचक वक्तव्य
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य साताऱ्यामध्ये केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. रविवारी राज्यात 11 हजार रूग्णांची नोंद झाली. ही बाब नक्कीच चांगली नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू शकतो असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. काय म्हणाले अजित पवार? ‘राज्यात कोरोना रूग्णांची […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य साताऱ्यामध्ये केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. रविवारी राज्यात 11 हजार रूग्णांची नोंद झाली. ही बाब नक्कीच चांगली नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू शकतो असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
काय म्हणाले अजित पवार?
‘राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढायला लागली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा कोरोना रूग्णांची संख्या वाढायला लागल्यानंतर निर्बंध आणले गेले आहेत. त्यामुळे अशी वेळ आपल्याकडेही येऊ शकते’ असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.