विदेशात राहून राजकारण कसं होईल? ममता बॅनर्जींचा राहुल गांधींना टोला

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे साहजिकच 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी तिसरी आघाडी उभी राहणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र भाजपला सक्षम पर्याय हवा असं म्हणत असतानाच ममता बॅनर्जींनी राहुल गांधींवरही टीका केली आहे. विदेशात राहून राजकारण कसं होईल? असा प्रश्न ममता बॅनर्जींनी उपस्थित केला आहे.

Sharad Pawar हे विरोधकांचे भीष्म पितामह, ममता बॅनर्जी राष्ट्रीय आकर्षण-संजय राऊत

तुम्ही काँग्रेसविरोधात का लढत आहात? असा सवाल त्यांना करण्यात आला. काँग्रेस आणि डावे पक्ष बंगालमध्ये आमच्याविरोधात लढू शकतात तर आम्हीही त्यांच्याविरोधात जाऊ शकतो. भाजपला पराभूत करण्यासाठी आम्हाला ही लढाई लढावीच लागेल, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला सगळ्या पक्षांनी लढण्याची इच्छा असेल तरच भाजपच्या विरोधात राष्ट्रीय पर्याय तयार केला जाऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

ADVERTISEMENT

नेमकं काय म्हणाल्या ममता?

ADVERTISEMENT

पर्याय मजबूत असणे आवश्यक आहे. हे एकट्याने करता येत नाही. जर कोणी लढू शकत नसेल तर आपण काय करू शकतो? सर्व पक्षांनी लढावे अशी आमची इच्छा आहे.’ असं त्या म्हणाल्या. त्यांचा अंगुलीनिर्देश हा सरळ काँग्रेसकडे होता. एक मजबूत विरोधी पक्ष तयार करण्याची वेळ आली आहे आणि सर्व समान विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन एकता दाखवण्याची गरज आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

‘शरद पवार हे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत आणि मी त्यांच्यासोबत दीर्घकाळ काम केले आहे, म्हणून मी शरद पवार यांच्याशी राजकीय सौजन्य भेटीसाठी आले आहे. शरद पवारांच्या मताशी मी सहमत आहे असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, शरद पवार यांनीही पर्यायाच्या नेतृत्वावरील प्रश्न फेटाळून लावला आणि ‘सध्याच्या घडीला भाजपच्या विरोधात विविध समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. ‘समविचारी शक्तींना एकत्र आणून सामूहिक मोर्चा सादर करण्याचा तिचा हेतू आहे आणि त्या उद्देशाने ममता बॅनर्जी मला भेटल्या, आमच्यात सकारात्मक चर्चा झाली’ असंही पवार म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT