या सरकारला ‘अमराठी’ का म्हणू नये, मनसे नेते खोपकर संतापले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मराठी भाषा दिनानिमित्त मनसेने मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात ‘मराठी स्वाक्षरी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, कोरोना संसर्गामुळे पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. यानंतर मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या सरकारला ‘अमराठी’ का म्हणू नये? असं सवाल विचारात प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

याचवेळी खोपकर असंही म्हणाले आहेत की, ‘गंभीर आरोप असलेल्या संजय राठोड यांच्यासारखे मंत्री गर्दी जमवत असताना त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक नाही.’ त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावरुन मनसे-शिवसेना यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मनसेकडून 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे मराठी भाषा दिनानिमित्त मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाचं आयोजन केले होतं. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठी कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमासाठी मनसेकडून पोलीस आणि मुंबई महापालिकेकडे रितसर परवानगी मागितली होती. पण राज्यातील कोरोना संसर्ग लक्षात घेता पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच हा कार्यक्रम केल्यास अमेय खोपकर आणि मनसे कार्यकर्त्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

‘कोविडचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने जी नियमावली आखून दिलेली आहे, त्या नियमांचं काटेकोर पालन करुन मनसेने ‘मराठी भाषा दिन’ कार्यक्रम आयोजित केला होता. सरकारने या कार्यक्रमाला कोविड प्रसाराचं कारण देत परवानगी तर नाकारलीच, वर कारवाईचा धाक दाखवला. ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत अशा संजय राठोडसारख्या मंत्र्याचे समर्थक लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करतात, अशा गर्दीवर कारवाई करण्याची ज्यांच्यात धमक नाही, त्यांच्या डोळ्यात ‘मराठी भाषा दिवस’ का खुपतो? महाबिघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर नाही यावर शिक्कामोर्तबच झालंय, पण त्यापुढे जाऊन आता शंका यायला लागली आहे की हे सरकारच ‘अमराठी’ आहे की काय? आम्ही हे ठणकावून सांगतो की नियोजित कार्यक्रम आम्ही सर्व नियम पाळून करणार म्हणजे करणारच.’ असं म्हणत अमेय खोपकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT