Raj-Uddhav Thackeray: 'जे बाळासाहेबांना, जमलं नाही.. ते फडणवीसना जमलं', राज ठाकरे असं का म्हणाले?

मुंबई तक

'जे बाळासाहेबांना, अनेकांना जमलं नाही.. आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसना जमलं..' असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या भाषणात केलं.

ADVERTISEMENT

Raj Thackeray
Raj Thackeray
google news

मुंबई: 'जे बाळासाहेबांना, अनेकांना जमलं नाही.. आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसना जमलं..' असं विधान करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विजयी मेळाव्यात सुरुवातीलाच हिंदी भाषा सक्तीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. 

पाहा विजयी मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय म्हणाले

'मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं होतं. पण फक्त मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. खरं तर आजचाही मेळावा शिवतीर्थावर मैदानात व्हायला हवा होता. मैदान ओसांडून वाहलं असतं. पण पाऊस आहे त्यामुळे इथे कार्यक्रम घ्यावा लागला.' 

'मी माझ्या मुलाखतीत म्हटलं होतं की, कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र हा मोठा आहे. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही.. आम्हाला दोघांना एकत्र आणायचं.. ते देवेंद्र फडणवीसना जमलं.'

हे ही वाचा>> Raj-Uddhav: बाळासाहेबांच्या मनातलं चित्र कॅमेऱ्यात झालं कैद, ठाकरेंच्या शिवसेनेने शेअर केलेला 'हा' फोटो पाहिलात का?

'खरं तर कोणचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा.. माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे कोणी वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी. हे कुठून अचानक आलं हिंदीचं मला कळलं नाही. हिंदी.. कशासाठी हिंदी.. त्या लहान लहान मुलांवर तुम्ही जबरदस्ती करतायेत.' 

हे वाचलं का?