Sakinaka Rape case : साकीनाका असो की पुणे, सगळ्याच घटना भयानक; फडणवीसांनी व्यक्त केली चिंता

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईतील साकीनाका परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करून गुप्तांगात रॉड घालून जखमी केल्याची थरकाप उडवणारी घटना शुक्रवारी घडली. घटनेतील महिलेचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. तसेच पोलीस विभागाकडे सरकारचं लक्ष वेधलं.

‘साकीनाकात घडलेला एकूण प्रकार आणि त्यानंतर झालेला निर्भयाचा मृत्यू हा मन सुन्न करणाऱा आहे. चटका लावून जाणारा आहे. गेल्या महिनाभराच्या काळात बलात्काराच्या घटना घडत आहेत. याकडे लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. साकीनाक्याचा विषय असेल, अमरावतीमध्ये एका १७ वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना असेल, पुण्यात तीन घटना घडल्या. त्यात सामूहिक बलात्काराच्याही घटना आहे. पालघरमध्ये घटना घडली आहे. या सगळ्या घटना अतिशय भयानक आहेत’, अशी चिंता फडणवीस यांनी व्यक्त केली.

‘मुंबईचा लौकिक एक सुरक्षित शहर म्हणून आपण पाहत आहोत. मुंबईमध्ये रात्री-अपरात्री महिलांना, मुलींना फिरताना कधी अडचण येत नाही. पण अशा प्रकारच्या घटना घडल्या, तर मुंबईच्या लौकिकाल धक्का पोहोचतो आणि असुरक्षिततेची भावना तयार होते. हा तर निर्घृण प्रकार आहे. माणसं इतकी पाशवी कशी होऊ शकतात, असा प्रश्न पडावा; इतका भयानक आहे’, असं फडणवीस म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबई सुन्न! बलात्कार पीडितेची मृत्युशी झुंज संपली; डॉक्टरांचे प्रयत्न ठरले अपयशी

‘आमची मागणी आहे की, सर्व आरोपींना अटक करावी. तत्काळ जलदगती न्यायालयात हे प्रकरण न्यावं. न्यायालयाच्या माध्यमातून या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा न्यायालय ठरवतं, पण अशा नराधमांना फाशीच झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर पोलीस विभागात काय चाललंय याचा विचार करण्याची गरज आहे. अशा घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना आहे, याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे’, असं फडणवीस म्हणाले.

ADVERTISEMENT

Sakinaka Rape case : “ताई, आम्हाला माफ कर… तुझा मृत्यू म्हणजे फक्त अजून एक नंबर”

ADVERTISEMENT

‘शक्ती कायद्यासंदर्भात बैठकांवर बैठका चालल्या आहेत. पण, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अस्तित्वात असलेल्या कायद्याचा वापर करून आपण फास्ट ट्रॅक (जलदगती न्यायालय) कोर्ट निर्माण करु शकतो. तिथे अशा प्रकारच्या केसेस चालवू शकतो. माझं म्हणणं असं आहे की, मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची भेट घेतली पाहिजे. हे प्रकरण फास्ट ट्रँक न्यायालयात चालवण्याची विनंती केली पाहिजे. महिला आयोगाच्या संदर्भात सरकारनं आश्वासनं दिलं. न्यायालयाने सरकारला निर्देश दिलेले आहेत. पण महिला आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक करण्यासाठी सरकारला वेळच नाहीये’, अशी टीका फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT