Nawab Malik: नवाब मलिकांचा ‘हायड्रोजन बॉम्ब’, फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ‘मी फडणवीसांबाबतच्या अंडरवर्ल्ड संबंधांबाबत हायड्रोजन बॉम्ब टाकणार आहे.’ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी (9 नोव्हेंबर) म्हटलं होतं. ज्यानुसार आज (10 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी संबंध होते आणि त्याचद्वारे ते लोकांकडे खंडणी वसूल करायचे असा आरोप नवाब मलिकांनी केले आहेत. दरम्यान, याप्रकरणाचे सगळे पुरावे आपण गृह खात्याला देणार असल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

‘देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आशीर्वादाने’च महाराष्ट्रात वसूली आणि बनावट नोटांचं रॅकेट खुलेपणाने सुरु होतं. समीर वानखेडे या अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी फडणवीसांकडून संपूर्ण प्रकरणाचं लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न सुरु आहे.’ असा अनेक आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केले आहेत.

पाहा नवाब मलिक यांनी नेमके काय-काय आरोप केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांना, गुन्हेगारांना शासकीय आयोग, बोर्डाच्या अध्यक्षपदी जागा दिली. मुन्ना यादव नावचा एक व्यक्ती जो नागपूरमधील नामचीन गुंड आहे ज्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल आहे. त्याला फडणवीसांनी कंस्ट्रक्शन बोर्डाचं अध्यक्ष बनवलं होतं’

मलिक पुढे म्हणाले की, हैदर आझम नावाचा आणखी एक व्यक्ती आहे ज्याला फडणवीसांनी फायनान्स कॉर्पोरेशनचा अध्यक्ष बनवलं होतं. खरं तर तो बांग्लादेशातून येणाऱ्या लोकांना मुंबई अनधिकृरित्या वसविण्याचं काम करतो. त्याची दुसरी पत्नी ही बांग्लादेशीच आहे. जिचा सध्या मालाड पोलिसांकडून तपास सुरु आहे. असं म्हटलं जात आहे की, जेव्हा पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते तेव्हा सीएम ऑफिसमधून कॉल आला आणि त्यानंतर हे प्रकरणं दाबलं गेलं.’ असा आरोप मलिकांनी फडणवीसांवर केला आहे.

ADVERTISEMENT

‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणात झाली वसुली’

ADVERTISEMENT

दरम्यान, नवाब मलिकांनी यावेळी असाही आरोप केला की, ‘देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वसूली करण्यात आली. मग ते प्रकरण बिल्डरचं असो किंवा एखादं भांडण.. सगळ्या प्रकरणात वसुली ही व्हायचीच. यावेळी असंही म्हटलं जायचं की, जर परदेशातून अंडरवर्ल्डचा फोन आला तर प्रकरण दाबलं जायचं.’ असं म्हणत मलिकांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

‘बनावट नोटांच्या व्यवसायाशी फडणवीसांचं कनेक्शन’

यावेळी नवाब मलिक यांनी असं म्हटलं की, ‘जेव्हा 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी झाली तेव्हा पंतप्रधान मोदींनी दहशतवाद, बनावट नोटा, काळा पैसा या सगळ्या गोष्टी उखडून फेकण्यासाठी नोटाबंदी करत असल्याचं सांगितलं होतं. ज्यानंतर संपूर्ण देशात अनेक ठिकाणी बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या. पण 8 ऑक्टोबर 2018 पर्यंत महाराष्ट्रात एकही बनावट नोट पकडण्यात आली नाही. कारण की, देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या आशीर्वादाने इथे बनावट नोटांचा खेळ हा सुरुच होता.’

मलिक पुढे म्हणाले ‘8 ऑक्टोबर 2017 रोजी एका छापेमारीत 14 कोटी 56 लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या पण ते प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी दाबून टाकलं. यामध्ये इमरान आलम शेख, रियाज शेख यांना पकडण्यात आलं. पण नंतर ही जप्ती फक्त 8 लाख 80 हजारांची असून ते प्रकरण देखील दाबण्यात आलं.’

‘यावरही सवाल उपस्थित करण्यात आले की, याप्रकरणी आरोपींना अगदी काही वेळातच जामीन कसा काय मिळाला?, हे प्रकरण NIA कडे का सोपवण्यात आलं नाही? या नोटा नेमक्या कुठून आल्या होत्या हे देखील समजू शकलं नाही. कारण त्याला तत्कालीन सरकारचं संरक्षण होतं.’

‘याच प्रकरणात अटक करण्यात आलेला इमरान आलम शेख हा अल्पसंख्यांक आयोगचा अध्यक्ष हाजी अरबाज शेख याचा छोटा भाऊ आहे. असं म्हटलं जातं की, हाजी अरबाज याला फडणवीसांनीच अध्यक्षपदी विराजमान केलं होतं.’ असं म्हणत मलिकांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

मलिक विरुद्ध फडणवीस : ‘त्यांचं एकच लक्ष्य आहे’; अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांवर ‘ट्वीट’ हल्ला

रियाज भाटीवरुन देखील फडणवीसांवर गंभीर आरोप

याच पत्रकार परिषदेत नवाब मलिकांनी आणखी एक आरोप फडणवीसांवर केला. ‘देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं की, रियाज भाटी कोण आहे? तो बनावट पासपोर्टसह पकडला गेला होता. तो दाऊद इब्राहिमचा खास माणूस आहे. हाच रियाज भाटी डबल पासपोर्टसह पकडला गेला होता. पण अवघ्या दोन दिवसात तो सुटला. खरं तर तो भाजपच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये देखील दिसायचा. एवढंच नव्हे तर फडणवीसांच्या डिनर टेबलवर देखील त्यांच्या सोबत होता. यापुढे जाऊन मी सांगतो की, मला पंतप्रधानांवर आरोप करायचे नाहीत. पण तो देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात कसा पोहचला. पंतप्रधांनाकडे जाण्याआधी संबंधित व्यक्तीची संपूर्ण तयारी होते. अशावेळी तो थेट पंतप्रधानांना भेटून त्यांच्यासोबत फोटो कसा काय काढू शकतो?’ असे अनेक गंभीर सवाल मलिकांनी यावेळी उपस्थित केले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT