आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB चा पंच किरण गोसावीला आता पालघर पोलिसांनी केली अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मोहम्मद खान, प्रतिनिधी, पालघर

पालघरमधील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी केळवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या किरण गोसावीला अखेर पुण्यातून पालघर पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात किरण गोसावी हा एनसीबीचा पंच आहे.

पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी यांच्यावर केळवे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन तरुणांना परदेशात नोकरीनिमित्त पाठवण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे असे या दोन तरुणांची गोसावींनी फसवणूक केल्याचा दावा केला जात आहे. आर्यन खान प्रकरणात NCB ने ज्याला पंच केलं, तोच फसवणुकीचं रॅकेट चालवत असल्याचा आरोप झाल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

समीर वानखेडे-किरण गोसावी यांच्यात काय बोलणं झालं? प्रभाकर साईलने NCB ला काय सांगितलं?

मलेशियात नोकरीचं आमिष

ADVERTISEMENT

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवलेलं आहे. याच किरण गोसावीने अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांचीही त्याने दोन वर्षांपूर्वी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाखा रुपये गोसावी याने घेतले असल्याचा आरोप केला होता,

ADVERTISEMENT

फेसबुकवरुन ओळख

नवी मुंबई येथील कार्यालयातून किरण गोसावी हे फसवणुकीची रॅकेट चालवत होता. फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर उत्कर्ष आणि आदर्श यांना गोसावीने मलेशियाला कामाला लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर दोघांनीही गोसावीला बँक खात्यात पैसे पाठवले. त्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचे तिकीट आणि व्हिसा दिला. कोचीन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचे तिकीट आणि व्हिसा बोगस असल्याचे त्यांना समजले. ते पालघरला परत आले आणि आपली फसवणूक झाल्या प्रकरणी केळवा सागरी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते.

केळवा पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही म्हणून दोघांनीही तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर . दोन वर्षे उलटूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे उत्कर्ष तरे याने सांगितले होते. माझ्यासारख्या अनेक तरुणांची फसवणूक झाल्याची दाट शक्यता असल्याचे उत्कर्ष याने सांगितले. आमच्या फसवणूक प्रकरणामध्ये किरण गोसावी याला पोलिसांनी पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे उतकर्ष तरे आणि आदर्श यांनी सांगितले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT