महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा पूर्वनियोजित कट, यशमोती ठाकूर यांचा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अमरावती जिल्ह्यात 12 आणि 13 नोव्हेंबरला झालेली दंगल आणि हिंसाचाराच्या घटना या पूर्वनियोजित होत्या, असा धक्कादायक आरोप अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांसंबंधी भाजपा नेत्यांनी याप्रकरणी पोलिसांसमोर समर्पण केल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.

अमरावतीमध्ये गेल्या शुक्रवारी आणि शनिवारी घडलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता अशा पद्धतीची माहिती आणि अहवाल नोडल एजन्सी असलेल्या सायबर विभागाने दिला आहे. या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय विखारी पोस्ट आणि प्रचार दोन्ही बाजूंच्या कट्टरतावादी विचारांच्या लोकांमार्फत करण्यात आला असे सायबर विभागाच्या अहवालावरून दिसून येते. कारण यामुळे ध्रुवीकरण होऊन त्याचा फायदा कोणाला होईल हे स्पष्टच आहे. असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

12 आणि 13 नोव्हेंबर रोजी घडलेल्या हिंसाचारामागे दोन्ही बाजुंच्या कट्टरवादी गटांचा एकत्रितरित्या समावेश होता तसेच या माध्यमातून नेमका कुणाला फायदा होणार हे जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे.

यशोमती ठाकूर, पालकमंत्री

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान सायबर विभागाने दिलेल्या अहवालानुसार 12 व 13 नोव्हेंबर ला #AmravatiVoilence हा हॅशटॅग वापरुन अवघ्या काही मिनिटांतच चार हजार ट्विट्स तसेच पोस्ट करण्यात आलेत तसेच ट्विटर,फेसबुक आणि इंस्टाग्राम च्या माध्यमातून केलेल्या पोस्ट ह्या अत्यंत भडक आणि भावना भडकवणाऱ्या होत्या. तर त्या सोबत जोडण्यात आलेल्या चित्रफिती ह्या चुकीची माहिती देऊन विशिष्ट समाजाच्या भावना भडकवणाऱ्या होत्या.

त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेचे चुकीचे वर्णन करून तेढ निर्माण करणाऱ्या या पोस्ट ताबडतोब काढून टाकाव्यात अशा सूचना सायबर विभागाने दिल्या आहेत. मात्र या सर्व प्रकारांमध्ये जनतेच्या धार्मिक भावना भडकवून महाराष्ट्रात असंतोष निर्माण करुन अस्थिरता निर्माण करावी आणि त्याचा फायदा मतांचे ध्रुवीकरणसाठी करावा यासाठी हा सर्व पूर्वनियोजित कट होता असा दावा अमरावतीच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

36 पोस्ट पोलिसांच्या हाती

त्रिपुरा या ठिकाणी घडलेल्या कथित मशिदीच्या तोडफोडीची बातमी समोर आल्यानंतर महाराष्ट्रातल्या अमरावती, मालेगाव या शहरांमध्ये हिंसाचार उसळला होता. सर्वाधिक पडसाद उमटले ते अमरावतीत. या प्रकरणी आता 36 पोस्ट सायबर पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. मालेगाव, अमरावती आणि नांदेड या शहरांमध्ये जो हिंसाचार घडला त्यासाठी या पोस्ट कारणीभूत ठरल्या होत्या. या सगळ्या पोस्ट चिथावणी देणाऱ्या आहेत असं सायबर शाखेच्या पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

काय आहे या पोस्टमध्ये?

एकूण 36 पैकी 25 पोस्ट ट्विटरवर आहेत. सहा पोस्ट फेसबुक आणि इतर पाच पोस्ट ट्विटरवर आहेत. या पोस्टमुळेच हिंसाचार पेटला. सायबर सेलने यासंदर्भातला अहवाल सादर केला आहे. या मध्ये नमूद करण्यात आलं आहे की हिंसाचार माजवण्यासाठी. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी कशा प्रकारे चुकीचा प्रोपगंडा राबवला गेला. या सगळ्या पोस्टमधून चिथावणी देण्यात आली होती ज्यामध्ये हिंसाचार उसळला.

follow whatsapp

ADVERTISEMENT