राज ठाकरेंनी दादागिरी करण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर…; रामदास आठवलेंनी थोपटले दंड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या राज ठाकरेंच्या मागणीला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी विरोध केला आहे. राज ठाकरेंनी दादागिरी केली, तर त्यांना ‘ईट का जबाब पत्थर से’ अशा स्वरुपात उत्तर देऊ, असा इशारा आठवलेंनी राज ठाकरेंना दिला आहे.

केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हे गोंदिया दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज ठाकरे यांच्या भोंगे हटवण्याच्या मागणीबद्दल रामदास आठवले यांना विचारण्यात आलं होतं. त्यावर त्यांनी भूमिका मांडताना राज ठाकरे यांच्या मागणीला विरोध केला. त्याचबरोबर अयोध्येला जाणार असाल, तर रिकाम्या हाताने जाऊ नका, असा चिमटाही काढला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रामदास आठवले म्हणाले, “राज ठाकरेंना त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांनी चुकीची भूमिका घ्यायला नको. जर मंदिरात भोंगे लावायचे असतील तर ते लावू शकतात, पण मशिदींवरील भोंगे हटवण्याची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात आहे.

“ही गुंडागर्दी करण्याचीच गोष्ट आहे. राज ठाकरे जर अशाच पद्धतीने भूमिका घेत असतील, तर रिपब्लिकन पार्टी याचा विरोध करेल. बाबासाहेबांच्या संविधानाचं रक्षण करायचं आहे. त्यांना जर मंदिरावर भोंगे लावायचे असतील, तर त्यांनी लावावेत. मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी ही पुर्णपणे बेकायदेशीर आहे.”

“बाळासाहेब ठाकरेंनीही अशा पद्धतीची मागणी कधीही केली नाही. त्यांच्यासोबतही मुस्लीम समाजाचे नेतेही होते. दहशतवादी असलेल्या मुस्लिमांचा आम्हीही विरोध केलेला आहे. सगळ्यांनीच विरोध केला आहे.”

ADVERTISEMENT

“सर्वसामान्य मुस्लीम हे पूर्वी हिंदूच होते. मुघल आल्यानंतर ते हिंदूचे मुस्लीम बनले. तेही आपल्या समाजाचेच आहेत. त्यामुळे आपण त्यांचा विरोध करणं चांगली गोष्ट नाही. संविधानाने सगळ्यांना सर्वधर्म समभावाचीच शिकवण दिलेली आहे. राज ठाकरेंनी जर अशा पद्धतीनेच दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, तर ‘ईट का जबाब पत्थर से’ अशा स्वरुपात उत्तर देऊ,” असा इशारा रामदास आठवलेंनी दिला.

ADVERTISEMENT

‘रिकाम्या हाताने अयोध्येला जाऊ नका’

“अयोध्येला जात असतील, तर त्यांचं स्वागतच आहे. राम मंदिर बघायला जात असतील, तर राम मंदिराला मदत करत असतील, तर चांगली गोष्ट आहे. आम्ही बौद्ध आहोत, पण आम्ही हिंदू धर्मही आपलाच आहे. त्यामुळे त्यांना अयोध्येला जावं वाटतं असेल, तर जावं. पण इतके दिवस त्यांना अयोध्येची आठवण झाली नाही. कधी ते गेले नाहीत. मनसेने राम मंदिरासाठी मदत करावी. रिकाम्या हाताने जाणे चांगली गोष्ट नाही,” असा चिमटा आठवलेंनी राज ठाकरेंना काढला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT