वानखेडे कुटुंबाविरोधात नवाब मलिक यांचं घाणेरडं राजकारण, किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई तक

समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात नवाब मलिक अत्यंत हीन आणि घाणेरड्या दर्जाचं राजकारण करत आहेत असा आरोप आता भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. आज किरीट सोमय्यांची भेट क्रांती वानखेडे, यास्मिन वानखेडे आणि क्रांती रेडकर यांची भेट घेतली. त्यानंतर मला त्यांनी हे सांगितलं की नवाब मलिक जे आरोप करत आहेत त्यामुळे आम्ही व्यथित झालो आहोत. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात नवाब मलिक अत्यंत हीन आणि घाणेरड्या दर्जाचं राजकारण करत आहेत असा आरोप आता भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. आज किरीट सोमय्यांची भेट क्रांती वानखेडे, यास्मिन वानखेडे आणि क्रांती रेडकर यांची भेट घेतली. त्यानंतर मला त्यांनी हे सांगितलं की नवाब मलिक जे आरोप करत आहेत त्यामुळे आम्ही व्यथित झालो आहोत. नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विट्सचा, या कुटुंबीयांच्या बदनामीचा मी तीव्र निषेध करतो असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री फक्त एका ओळीचं ट्विट केलं आहे. या ट्विटची चांगलीच चर्चा होते आहे. तसंच हे ट्विट अनेकांनी रिट्विटही केलं आहे. आर्यन खानला अखेर पंचवीस दिवसांनी आज बॉम्बे हायकोर्टाने जामीन मंजूर केला. उद्या किंवा परवा त्याची तुरुंगातून सुटका होणार आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडींच्या नंतर नवाब मलिक यांनी एक ट्विट केलं आहे.

काय आहे नवाब मलिक यांचं ट्विट-

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! असं एका ओळीचं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे. हा डायलॉग शाहरुख खानच्या ओम शांती ओम या चित्रपटातील आहे. नवाब मलिक यांनी केलेल्या या ट्विटची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच होते आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp