चंद्रकांत पाटलांचं अभिनंदन, तर फडणवीसांना खुलं आव्हान; संजय राऊत ‘त्या’ विधानावर काय म्हणाले?
‘मनावर दगड ठेवून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं,’ असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यांच्या या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचं या विधानाबद्दल अभिनंदन केलं आहे. दुसरीकडे राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान दिलं आहे. माध्यमांशी बोलताना खासदार […]
ADVERTISEMENT

‘मनावर दगड ठेवून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं,’ असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यांच्या या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचं या विधानाबद्दल अभिनंदन केलं आहे. दुसरीकडे राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान दिलं आहे.
माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला, सभांना मोठा प्रतिसाद मिळतोय. पैठणमध्ये तर नाथसागरचं रस्त्यावर उसळला असं चित्र होतं. हे चित्र ज्यांनी महाराष्ट्रात चोऱ्या माऱ्या करून भाजप असेल वा इतर कुणी, त्यांच्या छातीत धडकी भरवणारे आहे.शिवसैनिकांच्या अश्रुंच्या पुरात हे डबल स्टॅण्डर्ड सरकार वाहून गेल्याशिवाय राहणार नाही,” असं राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
राज ठाकरेंना संजय राऊतांचा टोला
“सरकार पडण्याबद्दल आम्ही भाजप सरकार बोलणार नाही, पण हे सरकार टिकत नाही. हे सरकार बहुमत गमावेल. हे सरकार अंतर्गत कलहाने पडेल. हे सरकार मजबूत पायावर उभं नाही. त्यामुळे कुणाला काय पिपाण्या वाजवायच्या असतील, तर त्या वाजवू द्या. आमचा लाऊडस्पीकर महाराष्ट्राच्या जनतेचा बुलंद आवाज आहे, तो तसाच घुमत राहिल. भाडोत्री भोंगे आणि लाऊडस्पीकर यात फरक आहे,” असा टोला संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला.
Raj Thackeray: ”बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या जवळचे ‘बडवे’ सारखेच, मीही त्याचमुळे बाहेर पडलो”