परिस्थिती नसलेल्या आईने मोबाईल घेऊन दिला नाही; नववीत असलेल्या शुभमने गळफास लावून केली आत्महत्या

मुंबई तक

बारामती : वसंत मोरे आईने मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून नाराज झालेल्या नववीतल्या शाळकरी मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बारामती तालुक्यातील कऱ्हावगज मध्ये घडली. या घटनेमुळे कऱ्हावगज परिसरात शोककळा पसरली आहे. शुभम मोतीराम धोत्रे असे या मुलाचे नाव आहे. तो अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार शुभमचे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बारामती : वसंत मोरे

आईने मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून नाराज झालेल्या नववीतल्या शाळकरी मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बारामती तालुक्यातील कऱ्हावगज मध्ये घडली. या घटनेमुळे कऱ्हावगज परिसरात शोककळा पसरली आहे. शुभम मोतीराम धोत्रे असे या मुलाचे नाव आहे. तो अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार शुभमचे वडील पूर्वीच वारले आहेत आणि त्याची आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते आणि त्याचं पालनपोषण करते.

आई मोबाईल घेऊन देत नाही म्हणून लावला फास

शुभम गेली काही दिवसांपासून आईकडे नवीन मोबाईल घेण्यासाठी हट्ट करीत होता. पण परिस्थितीमुळे आई मोबाईल घेऊ शकत नव्हती. त्यातून निराश झालेल्या शुभमने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण अवचर यांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.

मुलांना लागतोय मोबाईलचं व्यसन

सध्या शाळकरी मुलांमध्ये मोबाईलचा वेड अधिकच वाढला आहे. अशात सोशल मीडिया आणि गेमिंगमुळे मुलं मोबाईलच्या आहारी गेले आहेत. खूप कमी वयात मुलं पालकांकडे मोबाईलसाठी हट्ट करतात. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिक्षण असल्याने अनेक पालकांनी आपल्या पाल्यांसाठी स्वातंत्र्य मोबाईल घेऊन दिले. मात्र ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, अशा पालकांना त्रास सहन करावा लागला. इतर मुलांकडे मोबाईल आहे, आपल्यालाही मोबाईल घेऊन द्यावा, असं हट्ट मुलं करतायेत.

अशात ज्यांची परिस्थिती आहे ते मोबाईल घेऊन देतात. पण ज्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नाही, अशा पालकांना मुलांच्या हट्टाला सामोरं जावं लागत आहे. अशाच पद्धतीने वडील नसलेल्या शुभमने देखील आपल्या आईकडे नवीन मोबाईल फोनची मागणी केली होती. परंतु परिस्थिती नसल्याने त्याची आई त्याला नवीन फोन घेऊन देऊ शकली नाही. किशोरवयीन असलेल्या शुभमने रागाच्या भरात गळफास लावून आत्महत्या केली. त्यामुळे पुन्हा एकदा लहान मुलं आणि मोबाईल ही समस्या समोर आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp