‘मुंबईकरांचे हाल झाले, तर घटनाबाह्य मुख्यमंत्री जबाबदार असतील’; आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर प्रहार

मुस्तफा शेख

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी 5 हजार कोटी रुपये दिले असून, लवकरच कामं सुरू होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, 5 हजार कोटींच्या कामांचे टेंडर रद्द करण्यात आल्यावरून आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र डागलंय. मुंबईतल्या शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले, “उद्योग क्षेत्रातील पाच मोठे प्रकल्प खोके सरकारमुळे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी 5 हजार कोटी रुपये दिले असून, लवकरच कामं सुरू होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, 5 हजार कोटींच्या कामांचे टेंडर रद्द करण्यात आल्यावरून आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र डागलंय.

मुंबईतल्या शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले, “उद्योग क्षेत्रातील पाच मोठे प्रकल्प खोके सरकारमुळे बाहेर गेले. कृषी क्षेत्रातही अशीच परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. खोके सरकारचं लक्ष्य राजकारणावर करत आहे”, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.

“जे सत्य बाहेर आणताहेत त्यांना एचएमव्ही म्हणताहेत. जे सत्य बोलताहेत, त्यांच्यावर दादागिरी केली जातेय. मुंबईबद्दल बोलायचं झालं, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमचा फोकस होता. इतर शहरांवरही फोकस होता”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“मुंबई महापालिकेत दडपशाही, हुकुमशाही सुरू आहे. मुंबई महापालिकेत अधिकारी दडपणाखाली कामं करताहेत. तीन महत्त्वाच्या गोष्टी सुरू आहेत. टेंडर, ट्रान्सफर आणि टाइमपास. मुबई महापालिकेत हे सुरू आहे”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीकास्त्र डागलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp