केंद्रीय यंत्रणांच्या नैराश्यातून अनिल देशमुख यांच्यावर कारवाई, आम्हाला चिंता नाही-शरद पवार

मुंबई तक

‘केंद्रीय यंत्रणांना आलेलल्या नैराश्यातून अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली. आम्हाला या गोष्टीची यत्किचितही चिंता वाटत नाही’ असं म्हणत शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. ED ने मुंबई आणि नागपूर या ठिकाणी अनिल देशमुख यांच्या घरांवर छापेमारी केली. त्याबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता शरद पवार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

‘केंद्रीय यंत्रणांना आलेलल्या नैराश्यातून अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली. आम्हाला या गोष्टीची यत्किचितही चिंता वाटत नाही’ असं म्हणत शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. ED ने मुंबई आणि नागपूर या ठिकाणी अनिल देशमुख यांच्या घरांवर छापेमारी केली. त्याबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पुण्यातमध्ये नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. याच कार्यालयात सुबोध मोहिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं.

आणखी काय म्हणाले शरद पवार?

ED वगैरे आम्हाला काही नवीन नाही. अनिल देशमुख हे काही पहिले नाहीत. अनेकदा सत्तेचा या पद्धतीने वापर करण्याचा पायंडा आत्ताच्या राज्यकर्त्यांनी घालून दिला आहे. त्याची आम्हाला अजिबात चिंता वाटत नाही. अनिल देशमुखांवर केंद्र सरकारच्या यंत्रणांनी आधीही कारवाई केली होती. पण त्यातून त्यांना हाती काय लागलं हे मला माहिती नाही. माझ्या मते हाती काहीही लागलं नाही. त्याचमुळे जे नैराश्य आलं आहे त्या नैराश्यातून आणखी काही त्रास देता येईल का? हाच आत्ताचा यंत्रणांचा प्रयत्न दिसतो आहे. त्याची चिंता करण्याचं आम्हाला काहीही कारण नाही.

‘अनिल देशमुख-अनिल परब ही तर प्यादी, खरे सूत्रधार सिल्वर ओक आणि वर्षावर बसलेत !’

हे वाचलं का?

    follow whatsapp