मोठी बातमी: राज ठाकरेंच्या ‘त्या’ भाषणावर आजच कारवाई करणार: पोलीस महासंचालक

मुंबई तक

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या जाहीर सभेत जे भाषण केलं त्यावर कारवाई केली जाणार की नाही याविषयी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेबाबत काही कारवाई करायची असल्यास आजच केली जाईल. याप्रकरणाकडे औरंगाबादचे आयुक्त लक्ष ठेवून आहेत. असंही रजनीश शेठ म्हणाले. पाहा पोलीस महासंचालक नेमकं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या जाहीर सभेत जे भाषण केलं त्यावर कारवाई केली जाणार की नाही याविषयी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेबाबत काही कारवाई करायची असल्यास आजच केली जाईल. याप्रकरणाकडे औरंगाबादचे आयुक्त लक्ष ठेवून आहेत. असंही रजनीश शेठ म्हणाले.

पाहा पोलीस महासंचालक नेमकं काय म्हणाले:

‘कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी स्पष्ट आदेश दिले आहेत. सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. एसआरपीएफ आणि होमगार्ड मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यात तैनात करण्यात आले आहेत. कायद्याची अंमलबजावणी ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणीही कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.’

‘औरंगाबादचे पोलीस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या भाषणाबाबत संपूर्ण अभ्यास केलेला आहे. त्या भाषणाच्या अनुषंगाने जी आवश्यक कारवाई करायची आहे त्यासाठी ते सक्षम आहेत आणि ते ती करतील.’

हे वाचलं का?

    follow whatsapp