'कोडगेपणा अनाकलनीय ...', 'मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोडींबाबत राज ठाकरेंचं सविस्तर भाष्य
Raj Thackeray on Traffic Jam : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ गॅस वाहतूक करणारा टँकर अपघातग्रस्त झाला होता. यानंतर तब्बल ३२ तास हा महामार्ग ठप्प झाला होता. यामुळे प्रवाशांना बराच त्रास सहन करावा लागला. यावरुनच आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी 'एक्स'वर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'मुंबई आणि पुणे ही या राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं आहेत असं एका बाजूला म्हणायचं आणि ३२ तास या दोन शहरांतील वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे बघायचं यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय आहे.' या पोस्टमध्ये नेमकं ते काय म्हणाले जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कोडगेपणा अनाकलनीय ...
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोडींबाबत राज ठाकरेंचं सविस्तर भाष्य
Raj Thackeray on Traffic Jam : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ गॅस वाहतूक करणारा टँकर अपघातग्रस्त झाला होता. यानंतर तब्बल 32 तास हा महामार्ग ठप्प झाला होता. यामुळे प्रवाशांना बराच त्रास सहन करावा लागला. यावरुनच आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी 'एक्स'वर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'मुंबई आणि पुणे ही या राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं आहेत असं एका बाजूला म्हणायचं आणि 32 तास या दोन शहरांतील वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे बघायचं यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय आहे.' या पोस्टमध्ये नेमकं ते काय म्हणाले जाणून घेऊया.
हे ही वाचा : पार्थ पवारांना मोठा दिलासा, मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात निर्दोष? खारगे समितीच्या अहवालात नेमकं काय?
राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास 32 तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार, प्रसाशन घेतं का? हा प्रश्न आहे.
मंगळवार 3 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 च्या आसपास गॅसचा टँकर उलटला. त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली, हे पण योग्य झालं. पण अशा घटना घडल्या तर काय काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? स्व. बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला, त्याला 24 वर्ष उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं. मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली ती म्हणजे टोल वसुली.










