विधानसभा अध्यक्ष निवडीचा चेंडू अद्यापही राज्यपालांच्याच कोर्टात!

मुंबई तक

विधानसभा अध्यक्ष या अधिवेशनात तरी मिळणार का? याचं उत्तर देऊ शकतात ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. होय विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची सगळी तयारी जरी झालेली असली तरीही सरकारतर्फे राज्यपालांना एक पत्र दिलं जाणार आहे. त्या पत्रात निवडणूक कधी घेणार आहोत, कुणाला अध्यक्ष करणार आहोत या सगळ्याची माहिती असेल. राज्यपालांनी जर संमती दिली तरच ही निवडणूक पार पडू […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

विधानसभा अध्यक्ष या अधिवेशनात तरी मिळणार का? याचं उत्तर देऊ शकतात ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. होय विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची सगळी तयारी जरी झालेली असली तरीही सरकारतर्फे राज्यपालांना एक पत्र दिलं जाणार आहे. त्या पत्रात निवडणूक कधी घेणार आहोत, कुणाला अध्यक्ष करणार आहोत या सगळ्याची माहिती असेल. राज्यपालांनी जर संमती दिली तरच ही निवडणूक पार पडू शकणार आहे. त्यांनी संमती जर दिली नाही तर या अधिवेशनातही अध्यक्षांची निवड होणार नाही. शिवसेनेच्या सूत्रांनी मुंबई तकशी बोलताना ही माहिती दिली आहे.

हिवाळी अधिवेशन: ‘मी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं भित्रं सरकार पाहिलेलं नाही’, फडणवीसांची तुफान टोलेबाजी

विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भातलील समितीचा अंतरिम अहवाल सभागृहात मांडण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी हा अहवाल मांडला. ज्यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की आपल्याकडे बहुमताचा आकडा आहे असं आपलं म्हणणं आहे तर मग एवढी भीती का? आपल्या आमदारांवर एवढा अविश्वास आहे का?

ठाकरे सरकार आणि भगतसिंह कोश्यारी यांच्यात विस्तव का जात नाही?