‘…मग आम्हीही राहुल गांधींच्या बाबतीत हे बोलू शकतो’, फडणवीसांवर संजय राऊतांचा प्रहार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल केलेल्या विधानांचे पडसाद राज्यात उमटले आहेत. त्यावर भूमिका मांडताना देवेंद्र फडणवीसांनी भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांची पाठराखण केल्याचा आरोप होतोय. संजय राऊतांनी यावरूनच फडणवीसांवर प्रहार केलाय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानानं राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. […]
ADVERTISEMENT

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल केलेल्या विधानांचे पडसाद राज्यात उमटले आहेत. त्यावर भूमिका मांडताना देवेंद्र फडणवीसांनी भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांची पाठराखण केल्याचा आरोप होतोय. संजय राऊतांनी यावरूनच फडणवीसांवर प्रहार केलाय.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानानं राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. दोघांनी केलेल्या विधानांमुळे भाजप टीकेचं धनी ठरलंय. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडली.
‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या बोलण्याचे निश्चितच वेगवेगळे अर्थ काढण्यात आलेत,’ असं फडणवीस म्हणाले आहेत. तर सुधांशू त्रिवेदींनी कोणत्याही वक्तव्यामध्ये शिवाजी महाराजांनी माफी मागितली असं म्हटलेलं नाही, असं फडणवीस म्हणाले.
राज्यपालांच्या बोलण्याचे वेगळे अर्थ काढण्यात आले : वादावर फडणवीस आणखी काय म्हणाले?