राजीव सातव यांच्या आठवणीत राहुल गांधी भावूक; म्हणाले, तो सतत जनतेबद्दल बोलायचा…

मुंबई तक

हिंगोली : राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात सातवा दिवस आहे. कन्याकुमारी ते कश्मीर अशी सुरु असलेली यात्रा सध्या हिंगोलीमध्ये आहे. या दरम्यान, हिंगोलीमध्ये पोहचताच राहुल गांधी यांना त्यांचा मित्र आणि दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकर्षाने कमतरता जाणवली. कॉर्नर सभेत बोलतानाही राहुल गांधी यांनी भावूक होऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

हिंगोली : राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात सातवा दिवस आहे. कन्याकुमारी ते कश्मीर अशी सुरु असलेली यात्रा सध्या हिंगोलीमध्ये आहे. या दरम्यान, हिंगोलीमध्ये पोहचताच राहुल गांधी यांना त्यांचा मित्र आणि दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकर्षाने कमतरता जाणवली. कॉर्नर सभेत बोलतानाही राहुल गांधी यांनी भावूक होऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

राहुल गांधी म्हणाले, मी जेव्हा इथे आलो तेव्हा वाटलं की ते पण अशाच बैठकीत आपल्या सोबत बसले असते. त्यामुळे दुःख झालं. दुःख झालं कारण, तो माझा मित्र होता. काम चांगलं करायचा. पण त्यापेक्षाही जास्त दुःख झालं कारण, मला माहिती आहे, तुमचा आवाज राजीव सातवच्या तोंडून यायचा. तो जेव्हाही मला भेटायचा, तेव्हा तुमच्या प्रश्नांबद्दल बोलायचा. तुमच्या बद्दल सांगायचा. त्याने आपल्याबाबत कधीच माझ्यासोबत बोलला नाही. त्यामुळे दुःख आहे.

पण आनंदी देखील आहे, की मी इथे आहे. माझ्या मित्राच्या कर्मभुमीत आहे. आनंद आहे की त्यांची पत्नी पदयात्रेत आज माझ्यासोबत दिवसभर चालली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत. सकाळी ६ वाजल्यापासून आतापर्यंत, असंही राहुल गांधी म्हणाले. या यात्रेदरम्यान काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना राजीव सातव यांची प्रतिमा भेट दिली.

राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्याविषयीच्या भावना त्यांच्या फेसबुक पोस्टमधूनही मांडल्या. ते म्हणाले,

हे वाचलं का?

    follow whatsapp