‘शेतकऱ्यांसमोर माफी मागणार का?’; उद्धव ठाकरेंवर भाजपकडून प्रश्नांची सरबत्ती
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. परतीच्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी ठाकरे करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावरून भाजपनं काही प्रश्न उपस्थित केलेत. भाजपचे मुख्य प्रवक्त केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आलेल्या घोषणावरून ठाकरेंना लक्ष्य केलंय. उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्ह्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या […]
ADVERTISEMENT

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. परतीच्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी ठाकरे करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावरून भाजपनं काही प्रश्न उपस्थित केलेत. भाजपचे मुख्य प्रवक्त केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आलेल्या घोषणावरून ठाकरेंना लक्ष्य केलंय.
उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्ह्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करणार आहे. ठाकरेंच्या एकदिवसीय दौऱ्यावरून भाजपनं टीका केलीये. “उद्धव ठाकरे हे आज मराठवाडा दौऱ्यावर शेतकऱ्यांना भेटायला जात आहेत. जरूर जावे पण काही प्रश्नांची उत्तरे ही द्या…”, असं म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती केलीये.
“चिपळूण येथील अपरांत रुग्णालयात मागील वर्षी जुलै महिन्यात पूर परिस्थितीमुळे मरण पावलेल्या ८ कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना विशेष बाब म्हणून प्रत्येकी ४ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली होती. पुढे एक वर्ष उलटल्यानंतरही ही मदत मिळालीच नाही. तुमच्या पोकळ आश्वासनावर आपत्तीग्रस्तांनी आज प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर देणार?”, असा सवाल केशव उपाध्ये यांनी केलाय.
शिंदे बंडानंतर ठाकरे पहिल्यांदा मुंबईबाहेर; थेट औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार