कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : राजू शेट्टींचं मन वळवण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न

मुंबई तक

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर राज्यातील कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचं वातावरण रंगायला सुरुवात झाली आहे. भाजपने या पोटनिवडणुकीत सत्यजित कदम यांना तिकीट दिलं असून काँग्रेसने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. या जागेवर निवडणुक लढवण्यासाठी शिवसेनाही उत्सुक होती, परंतू पक्षनेतृत्वाने माघार घेण्याचा आदेश दिल्यानंतर शिवसेना नेत्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. अशा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर राज्यातील कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचं वातावरण रंगायला सुरुवात झाली आहे. भाजपने या पोटनिवडणुकीत सत्यजित कदम यांना तिकीट दिलं असून काँग्रेसने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. या जागेवर निवडणुक लढवण्यासाठी शिवसेनाही उत्सुक होती, परंतू पक्षनेतृत्वाने माघार घेण्याचा आदेश दिल्यानंतर शिवसेना नेत्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत.

अशा परिस्थितीत भाजप नेत्यांनी या पोटनिवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरातील भाजप नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची भेट घेत भाजप उमेदवाराला पाठींब्याची मागणी केली आहे.

Kolhapur Bypoll: भाजपने कोल्हापुरातून सत्यजित कदम यांनाच तिकीट का दिलं?

भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, माजी खासदार धनंजय महाडीक, माजी आमदार सूरेश हाळवणकर आणि आजी-माजी पदाधिकऱ्यांनी राजू शेट्टींची भेट घेत त्यांच्या पाठींब्याची मागणी केली आहे. या बैठकीनंतर राजू शेट्टींनी कार्यकर्त्यांशी विचारविनीमय करुन पाठींब्याबद्दल निर्णय जाहीर करु असं सांगितलं आहे. भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीच्या सोबत गेलेल्या राजू शेट्टींची गेल्या अडीच वर्षांच्या काळात राज्य सरकारवर नाराजी घट्ट झालेली पहायला मिळते आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp