दिल्लीतील कोरोना आकडेवारी चिंता वाढवणारी, संसर्गाचे प्रमाण 20 टक्क्यांवर

मुंबई तक

दिल्ली-एनसीआरमधील लोकांनी अद्याप कोरोनाला पराभूत केले नाही तोच विषाणूजन्य ताप आणि फ्लूने पुन्हा दार ठोठावले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी, त्याची भीती लोकांच्या मनातून निघून गेलेली आहे, ज्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. एक चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 30 दिवसांत, 10 पैकी 8 कुटुंबे कोरोना किंवा विषाणूजन्य ताप किंवा फ्लूच्या विळख्यात अडकली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

दिल्ली-एनसीआरमधील लोकांनी अद्याप कोरोनाला पराभूत केले नाही तोच विषाणूजन्य ताप आणि फ्लूने पुन्हा दार ठोठावले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी, त्याची भीती लोकांच्या मनातून निघून गेलेली आहे, ज्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. एक चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 30 दिवसांत, 10 पैकी 8 कुटुंबे कोरोना किंवा विषाणूजन्य ताप किंवा फ्लूच्या विळख्यात अडकली आहेत. लोक म्हणतात की त्यांना कोरोना किंवा सर्दी सारखी लक्षणे जाणवली आहेत.

पावसाळ्यात विषाणूजन्य ताप, सर्दी यांचे प्रमाण वाढणे सामान्य आहे. परंतु सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की ते खूप वेगाने आणि मोठ्या संख्येने वाढत आहे. हे चिंता वाढवणारे आहे. गेल्या वर्षी केलेल्या सर्वेक्षणानुसार, दिल्ली-एनसीआरमधील 41 टक्के कुटुंब सध्या विषाणूच्या विळख्यात आहेत, तर या वर्षी जुलै ते ऑगस्ट दरम्यान, 82 टक्के कुटुंबांची तब्येत खराब आहे. अशा प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागे कोरोना हे देखील एक मोठे कारण असू शकते.

बहुतेक लोकांनी कोरोनाची लक्षण असल्याचं उघड

लोकलसर्कल नावाच्या प्लॅटफॉर्मने याबाबत माहिती गोळा करण्यासाठी सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणानुसार, 10 पैकी 8 कुटुंबांनी कबूल केले की त्यांच्या कुटुंबातील एक किंवा अधिक लोकांना कोविडसदृष लक्षणे जाणवत आहेत. ज्यामध्ये ताप, नाक वाहणे, थकवा इत्यादी लक्षणं दिसत आहेत.

अहवालानुसार, बहुतेक लोकांना कोविड किंवा व्हायरल ताप आहे की नाही हे होम किटच्या मदतीने शोधले. यामध्ये कोरोना किंवा व्हायरल ताप हे दोन्ही चिंता वाढवणारे आहे. कारण कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका नेहमीच असतो. विशेषत: लहान मुले किंवा ज्यांचे आरोग्य चांगले नाही, त्यांना धोका अधिक असतो.

हे वाचलं का?

    follow whatsapp