दिल्लीत शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप होत असलेला दीप सिद्धू कोण?

मुंबई तक

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीत अचानक हिंसाचाराला सुरवात झाली. आणि बघता बघता दोन महिन्यांपासून शांततेत सुरू असलेलं शेतकरी आंदोलन हिंसक रूप घेताना दिसलं. ३ कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं दिल्ली-हरयाणा बॉर्डरवर शांततेत आंदोलन सुरू आहे. त्यामुळे अचानक आंदोलक हातघाईवर का आले, असा प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे दीप सिद्धू कोण होता, तो शेतकरी आंदोलनात कसा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीत अचानक हिंसाचाराला सुरवात झाली. आणि बघता बघता दोन महिन्यांपासून शांततेत सुरू असलेलं शेतकरी आंदोलन हिंसक रूप घेताना दिसलं. ३ कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं दिल्ली-हरयाणा बॉर्डरवर शांततेत आंदोलन सुरू आहे. त्यामुळे अचानक आंदोलक हातघाईवर का आले, असा प्रश्न विचारला जातोय.

त्यामुळे दीप सिद्धू कोण होता, तो शेतकरी आंदोलनात कसा पोचला, आणि त्याचं नेमकं कनेक्शन काय, याची लोकांमध्ये खूप चर्चा होतेय.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीत अचानक हिंसाचाराला सुरवात झाली. आणि बघता बघता दोन महिन्यांपासून शांततेत सुरू असलेलं शेतकरी आंदोलन हिंसक रूप घेताना दिसलं. काही शेतकरी नेत्यांनी लाल किल्ल्यातल्या हिंसाचारासाठी दीप सिद्धू आणि किसान मजदूर संघर्ष समिती नावाची संघटना जबाबदार असल्याचा आरोप केलाय.

लाल किल्ल्यात शिरून तिथे जो निशाण साहीब झेंडा फडकावण्यात आलाय, त्यामागंही दीप सिद्धूचाच हात असल्याचं म्हटलं जातंय. झेंडा फडकवण्याची ही घटना घडली तेव्हाही दीप सिद्धू तिथे उपस्थित होता. त्यामुळे दीप सिद्धूनेच आंदोलकांना भडकावलं आणि त्यांची दिशाभूल केली, असा आरोप भारतीय किसान युनियन हरयाणाचे प्रमुख गुरनाम सिंह चढूनी यांनी केलाय. तसंच तो सरकारचा दलाल असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp