Maharashtra Bandh: ‘जालियनवाला बाग तर पुण्यातील मावळमध्ये झालेलं’, फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार

मुंबई तक

मुंबई: ‘हे तेच लोकं आहेत ज्यांनी पुणे (Pune) जिल्ह्यातील मावळमधील (Maval) पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांना गोळ्या झाडून ठार मारलं होतं. ते जालियनवाला बाग (Jallianwala Bagh) होतं. म्हणून मला वाटतं की, जालियनवाला बागेची आठवण देणारे जे लोकं आहेत ते बहुदा मावळची गोष्ट विसरले आहेत.’ अशी प्रतिक्रिया देत भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: ‘हे तेच लोकं आहेत ज्यांनी पुणे (Pune) जिल्ह्यातील मावळमधील (Maval) पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांना गोळ्या झाडून ठार मारलं होतं. ते जालियनवाला बाग (Jallianwala Bagh) होतं. म्हणून मला वाटतं की, जालियनवाला बागेची आठवण देणारे जे लोकं आहेत ते बहुदा मावळची गोष्ट विसरले आहेत.’ अशी प्रतिक्रिया देत भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर पलटवार केला आहे.

‘मावळची जी घटना झाली होती त्यावेळी याच लोकांचं सरकार होतं. याच सरकारने शेतकऱ्यांवर गोळ्या झाडून त्यांना ठार केलं होतं. त्यामुळे आताचं हे सरकार देखील ढोंगी सरकार आहे. आम्ही त्यांची निंदा करतो.’ असं म्हणत फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर-खिरी येथे झालेल्या शेतकरी हत्याकांडाबाबत आज (11 ऑक्टोबर) महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलन पुकारलं आहे. पण हे आंदोलन पुकारणारं सरकार ढोंगी आहेत. अशी तिखट प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवारांवर निशाणा साधताना पाहा फडणवीस काय-काय म्हणाले:

हे वाचलं का?

    follow whatsapp