फडणवीसांचा राजकीय डाव शिवसेनेच्या वर्मी, ‘सामना’तून विरोधी पक्ष नेत्यावर टीकेची झोड

मुंबई तक

मुंबई: ‘मराठवाड्यातील पूरस्थितीविषयी एक संयमी भूमिका मांडणाऱ्या फडणवीस यांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय राजकारण साधलेच. म्हणजे पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’ होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का?,’ अशा शब्दात शिवसेनेने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून फडणवीसांवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. राज्यात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: ‘मराठवाड्यातील पूरस्थितीविषयी एक संयमी भूमिका मांडणाऱ्या फडणवीस यांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय राजकारण साधलेच. म्हणजे पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’ होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का?,’ अशा शब्दात शिवसेनेने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून फडणवीसांवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे.

राज्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे भीषण परिस्थिती ओढावलेली असताना देखील विरोधकांकडून राजकारण सुरु असल्याचा आरोप सामनातून करण्यात आला आहे.

नांदेडच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांची नुकसान पाहणी करण्यासाठी गेलेल्या फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते सुभाष साबणे यांना फोडत थेट विधानसभा पोटनिवडणुकीचं तिकिटच दिलं. फडणवीसांचा हा वार शिवसेनेच्या देखील वर्मी बसला आहे. अशावेळी आता सामनातून फडणवीसांवर निशाणा साधण्यात आला आहे.

‘सामना’च्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:

हे वाचलं का?

    follow whatsapp