विश्वासमताचा ठरावही भक्कम बहुमताने जिंकणार, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई तक

आज विधानमंडळात मतदान झालं. त्यामध्ये राहुल नार्वेकर १६४ मतं घेऊन निवडून आले. आमचे दोन सदस्य आजारी असल्याने दोन सदस्य आले नाहीत. एकूण १६६ लोकं आमच्या युतीच्या पाठिशी भक्कमपणे आहेत. सोमवारी विश्वासमताचा ठऱाव आम्ही ठेवत आहोत. हा ठरावही भक्कम बहुमताने मंजूर होईल हा मला विश्वास आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अधिवेशन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आज विधानमंडळात मतदान झालं. त्यामध्ये राहुल नार्वेकर १६४ मतं घेऊन निवडून आले. आमचे दोन सदस्य आजारी असल्याने दोन सदस्य आले नाहीत. एकूण १६६ लोकं आमच्या युतीच्या पाठिशी भक्कमपणे आहेत. सोमवारी विश्वासमताचा ठऱाव आम्ही ठेवत आहोत. हा ठरावही भक्कम बहुमताने मंजूर होईल हा मला विश्वास आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अधिवेशन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक विधासभेत पार पडली. त्यावेळी शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट हे सेनेतले गट समोरासमोर आले होते. त्यात संघर्ष होऊ शकतो असं वाटलं होतं. मात्र तसं काहीही झालं नाही. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी ही निवडणूक जिंकली. त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी अजित पवार यांनी केलेलं भाषण चांगलंच चर्चेत होतं. सत्ताधारी तसंच विरोधातल्या नेत्यांनी भाषणं केली.

Aditya Thackeray:”देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षापूर्वी कानात सांगितलेलं ऐकलं नाही”

हे वाचलं का?

    follow whatsapp