Devshayani Ekadashi 2023: कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी-महत्त्व

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढ महिन्यात साजरी केली जाणारी एकादशी आषाढी एकादशी म्हणून ओळखली जाते. याला देवशयनी एकादशी, हरिशयनी एकादशी आणि पद्मनाभ एकादशी या नावांनीही ओळखलं जातं. 29 जून 2023 रोजी देवशयनी एकादशीनंतर भगवान विष्णूचा निद्राकाळ सुरू होतो. तसंच चातुर्मासही सुरू होतो. चातुर्मासात विवाह, मुंडन, गृहप्रवेश यांसारख्या मांगलिक कार्यांना बंदी आहे. (Devshayani Ekadashi 2023 When is Ashadhi Ekadashi Know auspicious time, puja rituals importance)

धार्मिक शास्त्रानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीचे व्रत विष्णूजींची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते. पुराणानुसार श्रीहरी भगवान विष्णू चार महिने योगनिद्रेसाठी क्षीरसागरात जातात, म्हणूनच या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात.

KCR यांच्यावर महाराष्ट्रात येताच ठपका, शरद पवारांनंतर संजय राऊत काय बोलले?

Devshayani Ekadashi 2023 : देवशयनी एकादशीचा शुभ मुहूर्त

  • हिंदू दिनदर्शिकेनुसार, देवशयनी एकादशीचे व्रत यावेळी 29 जून 2023, गुरुवारी आहेत. याची तिथी 29 जून रोजी पहाटे 03:18 वाजता सुरू होईल आणि 30 जून रोजी दुपारी 02:42 वाजता समाप्त होईल.
  • देवशयनी एकादशीचे पूजा-विधी कशाप्रकारे केले जातात?
  • देवशयनी एकादशीच्या दिवशी उपवास करणाऱ्या भाविकांनी पहाटे उठून पवित्र स्नान करावे.
  • त्यानंतर घरातील पूजेचे ठिकाण स्वच्छ केल्यानंतर गंगेच्या पाण्याने शुद्ध करा.
  • नंतर, भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करा आणि देवाची पूजा करावी.
  • भगवान विष्णूला पिवळे वस्त्र, पिवळी फुले, पिवळे चंदन अर्पण करावे. देवाच्या हातात शंख, चक्र, गदा आणि कमळ सजवा.
  • यानंतर देवाला पान-सुपारी अर्पण करा, त्यानंतर धूप, दिवा आणि फुले अर्पण करा.
  • आता निस्वार्थ मनाने देवाची आरती करा. यामुळे संपूर्ण वातावरण प्रसन्न होईल.

BRS : तेलंगणात एकहाती सत्ता, आता महाराष्ट्रावर नजर; कोण आहेत केसीआर?

देवशयनी एकादशीचे महत्त्व

देवशयनी एकादशीलाच आषाढी एकादशी असं म्हणतात. या एकादशीचे नाव ‘देव’ आणि ‘शयन’ या दोन शब्दांनी बनलेले आहे. येथे देव हा शब्द भगवान विष्णूसाठी वापरला आहे आणि शयन शब्दाचा अर्थ झोपणे असा आहे. मान्यतेनुसार या दिवसापासून भगवान विष्णू चार महिने क्षीरसागरात निद्रा घेतात. देवशयनी एकादशीचे व्रत करणाऱ्यांचे सर्व दु:ख दूर होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात, असेही म्हणतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देवशयनी एकादशीची कथा

पौराणिक कथेनुसार, फार पूर्वी मांधाता नावाचा राजा होता. राजा खूप चांगला आणि दयाळू होता, त्यामुळे त्याची प्रजा त्याच्यावर नेहमीच आनंदी असायची. एकेकाळी राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. पूर्वी जे लोक आनंदी असायचे ते निराश आणि दुःखी झाले. प्रजेची ही अवस्था पाहून राजाने आपल्या प्रजेला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी वनात जाऊन उपाय शोधणे योग्य मानले. जंगलात जाताना अंगिरा राजा ऋषींच्या आश्रमात पोहोचला.

Bhagirath Bhalke : केसीआर यांचा धक्का, राष्ट्रवादीकडून तटबंदी सुरू!

ऋषींनी राजाला त्याच्या त्रासाचे कारण विचारले तेव्हा राजाने आपले सर्व दु:ख ऋषींसमोर मांडले. तेव्हा ऋषींनी राजाला आषाढी एकादशीला व्रत ठेवण्याचा सल्ला दिला. ऋषींची आज्ञा पाळल्यानंतर राजा आपल्या राज्यात परतला आणि प्रजेला हे व्रत निष्ठेने पाळण्याचा सल्ला दिला. उपवास आणि उपासनेचा परिणाम असा झाला की राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडला, त्यामुळे संपूर्ण राज्य पुन्हा धनधान्याने भरले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT