मोडला नाही कणा…नापिकीला कंटाळून दुग्धव्यवसायाकडे वळलेला शेतकरी कमावतोय लाखोंमध्ये

मुंबई तक

– ज्ञानेश्वर उंडाळ, हिंगोली प्रतिनिधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मागे गेल्या काही वर्षांपासून दुष्टचक्र लागलेलंच आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे राज्यातला शेतकरी हा पुरता मेटाकुटीला येऊन गेला आहे. सततच्या नापिकीमुळे आपलं आयुष्य संपवणाऱ्या शेतकऱ्यांच्या बातम्या आपण अनेकदा वाचल्या आहेत. परंतू हिंगोलीतले शेतकरी पंडीत श्रुंगारे याला अपवाद ठरले आहेत. २००७ साली नापिकीला कंटाळून पंडीत श्रुंगारे यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

– ज्ञानेश्वर उंडाळ, हिंगोली प्रतिनिधी

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मागे गेल्या काही वर्षांपासून दुष्टचक्र लागलेलंच आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे राज्यातला शेतकरी हा पुरता मेटाकुटीला येऊन गेला आहे. सततच्या नापिकीमुळे आपलं आयुष्य संपवणाऱ्या शेतकऱ्यांच्या बातम्या आपण अनेकदा वाचल्या आहेत. परंतू हिंगोलीतले शेतकरी पंडीत श्रुंगारे याला अपवाद ठरले आहेत. २००७ साली नापिकीला कंटाळून पंडीत श्रुंगारे यांनी घेतलेला निर्णय चांगलाच फायदेशीर ठरला आहे. शेतीला रामराम करत दुग्धव्यवसायाकडे वळलेले श्रुंगारे याच माध्यमातून आता लाखोंचं उत्पन्न घेत आहेत.

हिंगोली जिल्ह्यात २००७ साली झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पिक वाया गेलं. श्रुंगारे यांनाही या परिस्थितीचा फटका बसला. कुटुंबाला हातभार लागावा यासाठी श्रुंगारे यांनी शिक्षण अर्ध्यावर सोडत शेती करण्याचा निर्णय घेतला होता. परंतू शेतीतूनही फारसं हातात काहीच येत नसल्यामुळे पुढे करायचं काय हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. शेतीतून मिळणारं उत्पन्न हे अत्यंत कमी असल्यामुळे त्यांनी धाडस दाखवत दुग्धव्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.