मुंबईत गणपती विसर्जनावेळी पाच मुले बुडाली; दोघांना वाचवण्यात यश

मुंबई तक

लाडक्या गणरायाला रविवारी सर्वत्र निरोप देण्यात आला. मुंबईतही ठिकठिकाणी गणरायाचं विसर्जन करण्यात आलं. दरम्यान, गणेश विसर्जनावेळी पाच मुलं बुडाल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली. यात दोन मुलांना वाचवण्यात यश आलं असून इतर तिघांचा शोध घेतला जात आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात रविवारी गणरायाला निरोप देण्यात आला. दरम्यान गणपती विसर्जनादरम्यान मुंबईसह राज्यात काही ठिकाणी विसर्जनाला गालबोट लावणाऱ्या घटना घडल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

लाडक्या गणरायाला रविवारी सर्वत्र निरोप देण्यात आला. मुंबईतही ठिकठिकाणी गणरायाचं विसर्जन करण्यात आलं. दरम्यान, गणेश विसर्जनावेळी पाच मुलं बुडाल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली. यात दोन मुलांना वाचवण्यात यश आलं असून इतर तिघांचा शोध घेतला जात आहे.

मुंबईसह संपूर्ण राज्यात रविवारी गणरायाला निरोप देण्यात आला. दरम्यान गणपती विसर्जनादरम्यान मुंबईसह राज्यात काही ठिकाणी विसर्जनाला गालबोट लावणाऱ्या घटना घडल्या आहेत.

मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर रात्री गणपती विसर्जनादरम्यान 5 मुले बुडाल्याची घटना घडली. यात दोन मुलांना वाचविण्यात स्थानिकाना यश आलं. तर उर्वरित तीन मुले बेपत्ता आहेत. पोलीस, महापालिका, अग्निशामक दल आणि तटरक्षक दलाकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

नेमकं काय घडलं?

हे वाचलं का?

    follow whatsapp