Maharashtra: ‘तर शिंदे मुख्यमंत्रीच राहणार नाहीत, हे सरकारच कोसळेल’
Ulhas Bapat very important statement on political crisis: पुणे: महाराष्ट्राच्या (Maharashtra) सत्तासंघर्षावरील सुनावणी ही आता 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मात्र, या सत्ता संघर्षाबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी एक अत्यंत महत्त्वाचं असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या मते कोर्टाने सर्वात आधी 16 आमदारांच्या (16 MLAs) अपात्रेतवर निर्णय द्यावा. कारण त्याच निर्णयानंतर हे सरकार राहणार […]
ADVERTISEMENT

Ulhas Bapat very important statement on political crisis: पुणे: महाराष्ट्राच्या (Maharashtra) सत्तासंघर्षावरील सुनावणी ही आता 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मात्र, या सत्ता संघर्षाबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी एक अत्यंत महत्त्वाचं असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या मते कोर्टाने सर्वात आधी 16 आमदारांच्या (16 MLAs) अपात्रेतवर निर्णय द्यावा. कारण त्याच निर्णयानंतर हे सरकार राहणार की जाणार हे ठरणार आहे. (if court disqualifies 16 mlas eknath shinde will not remain cm government also collapse constitutional expert ulhas bapat opinion)
शिवसेनेने 16 आमदार अपात्र ठरवले होते. ज्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांना पत्रही देण्यात आलं होतं. आता याच 16 जणांना जर कोर्टाने अपात्र ठेवलं तर स्वत: एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) मुख्यमंत्री पद जाईल आणि त्यांचं सरकार देखील कोसळेल. असं मत उल्हास बापट यांनी व्यक्त केलं आहे. पाहा उल्हास बापट नेमकं काय म्हणाले:
16 आमदार कोणत्याही पक्षात विलीनच झाले नाही!
दोन तृतीयांश लोकं जर विलीन होण्यासाठी बाहेर पडले तरच ते आमदार म्हणून पात्र ठरतात. आता इथे आमदार हे इतर पक्षात विलीनच झालेले नाहीत. हे आमदार आम्हीच शिवसेना म्हणतायेत. पण माझ्या मते, हा खूपच हास्यास्पद प्रकार आहे. कारण तुम्ही जर का शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलात तर विधानसभेत गेल्यावर आम्ही शिवसेना असं नाही म्हणता येत. त्यामुळे आता खरी शिवसेना कोणती हे निवडणूक आयोग ठरवेल.
महाराष्ट्र सत्तासंघर्ष: 2 मिनिटांतच संपली सुनावणी, कोर्टात काय घडलं?