Jitendra Awhad: ‘उद्धव ठाकरेंचा दृष्टीकोन वाखण्याजोगा’, ‘त्या’ निर्णयाला स्थगिती तरीही आव्हाडांकडून CMचं कौतुक

मुंबई तक

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांनी उद्घाटन केलेल्या उपक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्थगिती दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना चांगलाच धक्का बसला आहे. याचबाबत आता जितेंद्र आव्हाड यांनी आता अतिशय सावध अशी प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घेऊयात जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले: ‘परळ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांनी उद्घाटन केलेल्या उपक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्थगिती दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना चांगलाच धक्का बसला आहे. याचबाबत आता जितेंद्र आव्हाड यांनी आता अतिशय सावध अशी प्रतिक्रिया दिली आहे.

जाणून घेऊयात जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले:

‘परळ नाक्यावर शंभर वर्षे जुनी चाळ होती. तिचा पुनर्विकास करण्याचं ठरलं आणि तिचा पुनर्विकास देखील झाला. पण तिथल्या एकाही रहिवाश्याला बेघर केलंल नाही. आर. आर. बोर्डानुसार अधिकचे घर मास्टर लिस्टमध्ये जातात आणि त्यातून विस्थापितांना तिथे अधिकची घरे देणं हा म्हाडाला अधिकार आहे.’

‘यातील 192 घरं ही म्हाडाच्या हातात होती. टीव्हीवर सांगितलं जात आहे की, कोणाची तरी घरं काढून घेतली जात आहेत. तर मी माझ्या आईची शप्पथ घेतो, मी त्यातला माणूस नाही.’

हे वाचलं का?

    follow whatsapp