कंगना रणौतचं वादग्रस्त वक्तव्य, नीलम गोऱ्हेंनी केली पद्मश्री पुरस्कार काढून घेण्याची मागणी

मुंबई तक

कंगना रणौतने आपल्या देशाबाबत जे वक्तव्य केलं आहे ते वरचा मजला रिकामा असल्यचं लक्षण आहे. तिने जे वक्तव्य जाहीर मुलाखतीत केलं आहे ते देशाचा अपमान आणि स्वातंत्र्यलढ्याचा अपमान आहे. त्यामुळे तिचा पुरस्कार काढून घ्यावा अशी विनंती मी राष्ट्रपतींना करणार आहे असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. काय आहे प्रकरण? ‘वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेते सुभाषचंद्र […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

कंगना रणौतने आपल्या देशाबाबत जे वक्तव्य केलं आहे ते वरचा मजला रिकामा असल्यचं लक्षण आहे. तिने जे वक्तव्य जाहीर मुलाखतीत केलं आहे ते देशाचा अपमान आणि स्वातंत्र्यलढ्याचा अपमान आहे. त्यामुळे तिचा पुरस्कार काढून घ्यावा अशी विनंती मी राष्ट्रपतींना करणार आहे असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

‘वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेते सुभाषचंद्र बोस या लोकांबद्दल बोललो तर या लोकांना माहित होते की रक्त सांडावं लागेल. पण ते हिंदुस्थानी-हिंदुस्थानींचं रक्त सांडू नये.. अर्थातच त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण तेव्हा जे स्वातंत्र्य मिळालं ती भीक होती. आपल्याला खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे.’

या कार्यक्रमात कंगना असंही म्हणाली की, ‘काँग्रेसची सत्ता असताना मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जेव्हा मी राष्ट्रवाद, सैन्य सुधारणा आणि माझ्या संस्कृतीचा प्रचार करते तेव्हा लोक म्हणतात की, मी भाजपचा अजेंडा चालवत आहे. खरं तर हा मुद्दा भाजपचा अजेंडा का असावा.. हा तर देशाचा अजेंडा असला पाहिजे.’

हे वाचलं का?