काँग्रेस बुडाली, तर देशही बुडेल; कन्हैया कुमारने सांगितलं काँग्रेस प्रवेशाचं कारण

मुंबई तक

मंगळवारचा दिवस काँग्रेससाठी महत्त्वाचा ठरला. मंगळवारी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी या दोघांनी काँग्रेस प्रवेश केला. या दोघांनी यानंतर पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस बुडाली तर देश बुडेल असं वक्तव्य कन्हैय्या कुमारने केलं आहे. काय म्हणाला कन्हैय्या कुमार? मला असं वाटतं की या देशात काही लोक हे फक्त लोक नाहीत तर विचार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मंगळवारचा दिवस काँग्रेससाठी महत्त्वाचा ठरला. मंगळवारी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी या दोघांनी काँग्रेस प्रवेश केला. या दोघांनी यानंतर पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस बुडाली तर देश बुडेल असं वक्तव्य कन्हैय्या कुमारने केलं आहे.

काय म्हणाला कन्हैय्या कुमार?

मला असं वाटतं की या देशात काही लोक हे फक्त लोक नाहीत तर विचार आहेत. या देशाची चिंतन परंपरा, संस्कृती, मूल्यं, इतिहास आणि वर्तमान बदलण्याचा त्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मी कुठे तरी वाचलं होती की तुम्ही तुमचा शत्रू निवडा, मित्र आपोआप बनत जातील. मी ती निवड आता केली आहे. जर काँग्रेस बुडाली तर देशही बुडेल हा विचार माझ्या मनात आला त्यामुळे लोकशाही मानणाऱ्या या पक्षात मी प्रवेश केला आहे असं कन्हैय्या कुमार यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp