किरीट सोमय्यांना धक्काबुक्की; गृहमंत्र्यांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना-भाजपतील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचं दिसत आहे. पुणे दौऱ्यावर असलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली. कार्यकर्त्यांच्या गराड्यात आणि झटापटीत सोमय्या पायऱ्यांवर कोसळले. या घटनेवरून भाजपने राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घटनेच्या चौकशीची आदेश दिले असन, घटनेबद्दलही माहिती दिली.

महाविकास आघाडीतील पक्षाच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चर्चेत असलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर होते. महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी जात असतानाच शिवसैनिकांनी सोमय्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर शिवसैनिकांनी धक्काबुक्कीही केली. भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिकांत झटापट झाली. यावेळी सोमय्या मुख्य दारासमोरील पायऱ्यांवर कोसळले.

पुणे महापालिकेत शिवसैनिकांकडून किरीट सोमय्यांना धक्काबुक्की, पायऱ्यांवर कोसळले सोमय्या

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या घटनेचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले आहेत. घटनेनंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत जशास तसे उत्तर देऊ शकतो, असा प्रत्यक्षपणे इशारा दिला. घटनेवरून राजकारण तापण्याची चिन्ह असून, त्यावर आता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाष्य केलं आहे.

‘पुण्यामध्ये जी घटना घडली आहे. त्या घटनेसंदर्भातील माहिती मी घेतली आहे. एका पक्षाचा कार्यक्रम सुरू असताना भाजपचे काही कार्यकर्ते त्याठिकाणी गेले. त्यावरून दोन्हींकडील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर ही घटना घडली आहे. या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत. दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल’, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

…पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही;
सोमय्यांसोबतच्या प्रकारानंतर फडणवीस संतापले

ADVERTISEMENT

शरद पवार या झुंडशाहीचं समर्थन करणार का?; भाजपचा सवाल

किरीट सोमय्यांसोबत झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेवरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना सवाल केला आहे. ‘आज पुण्यात किरीट सोमय्यांवर झालेला हल्ला हा तर उद्धव ठाकरे सरकारच्या भ्याडतेचे उदाहरण. असे हल्ले करून ना किरीट सोमय्या थांबतील, ना राज्यातील जनता. शरद पवार, दिलीप वळसे-पाटील या झुंडशाहीचं समर्थन करणार का?’, सवाल उपाध्ये यांनी पवार आणि वळसे-पाटील यांना विचारला आहे.

“आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत”

‘किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. आम्ही याबद्दल कायदेशीर कारवाई करू. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. पाया खालची वाळू घसरली, तर माणूस बेफाम होतो, त्याला कळत नाही आपण काय करतोय. मुद्दे संपले की माणूस गुद्द्यावर येतो’, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी या वादावर भूमिका मांडली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT