मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मोर्चाची हाक; सोमवारी कळंबमधून निघणार महामोर्चा

मुंबई तक

शिक्षण आणि नोकरीत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात 19 सप्टेंबर रोजी महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्याला आजूबाजूच्या परिसरातील तालुक्यासह 100 गावाहून 1 लाख हुन जास्त मराठा समाजातील बांधव एकत्र येतील, असा अंदाज आयोजकांकडून वर्तवला जात आहे. मराठा ठोक मोर्चानंतर राज्यातून निघणारा हा पहिलाच मोर्चा आहे. त्यामुळे याची जोरदार तयारी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिक्षण आणि नोकरीत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात 19 सप्टेंबर रोजी महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्याला आजूबाजूच्या परिसरातील तालुक्यासह 100 गावाहून 1 लाख हुन जास्त मराठा समाजातील बांधव एकत्र येतील, असा अंदाज आयोजकांकडून वर्तवला जात आहे. मराठा ठोक मोर्चानंतर राज्यातून निघणारा हा पहिलाच मोर्चा आहे. त्यामुळे याची जोरदार तयारी सुरु आहे. 50 टक्क्यांच्या आतील ओबीसी कोट्यातुनच आरक्षण घ्यावं, असं देखील या मोर्च्याच्या मागणीत अधोरेखित करण्यात आलं आहे.

महिलांचा मोठ्याप्रमाणात समावेश

गेल्या महिन्याभरापासून महामोर्च्याच्या आयोजनाची तयारी जोरात सुरु आहे. यात महिलांचा समावेश मोठ्याप्रमाणात आहे. महिलांची एक टीम गावोगावी फिरून बैठका घेत आहे. बैठकांमध्ये आपल्या कुटुंबांसह मोर्च्याला उपस्थित राहण्याचे आवाहन या महिला ब्रिगेड करत आहे. गेल्या महिनाभरापासून या बैठकांचा जोर आहे. त्यामुळे 19 तारखेला होणाऱ्या मोर्चात महिलांची संख्या मोठी असणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मोर्च्याच्या आधी कळंब शहरात मराठा समाजाची मोठी रॅली

हे वाचलं का?

    follow whatsapp