दहावी-बारावीच्या परीक्षा होणार

मुंबई तक

हर्षदा परब कोरोनाचे रुग्ण वाढले असले तरी दहावी बारावीच्या परीक्षा होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं. राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच या परीक्षा होणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. शालेय शिक्षण मंडळाने फेब्रुवारी महिन्यात जाहीर केल्यानुसार बारावीची परिक्षा 23 एप्रिल ते 21 मे होणार आहे. तर, दहावीची परिक्षा 29 […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

हर्षदा परब

कोरोनाचे रुग्ण वाढले असले तरी दहावी बारावीच्या परीक्षा होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं. राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच या परीक्षा होणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.

शालेय शिक्षण मंडळाने फेब्रुवारी महिन्यात जाहीर केल्यानुसार बारावीची परिक्षा 23 एप्रिल ते 21 मे होणार आहे. तर, दहावीची परिक्षा 29 एप्रिल ते 20 मे होणार आहे. याच वेळापत्रकानुसार परीक्षा होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. या परीक्षा ऑफलाईनच घेणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

यावेळी त्यांनी बोलतना दिलेल्या माहितीनुसार सध्या तरी शिक्षण मंडळावर परीक्षा घेण्यासाठी आणि परीक्षा न घेण्यासाठी असा दोन्ही बाजूने दबाव आहे. वर्षा गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार परीक्षा न घेण्यासाठी शहरी भागातून दबाव आहे. विशेषत: मुंबई आणि ठाणे परीसरातून काही विशिष्ट माणसं यासाठी दबाव टाकत असल्याचं प्राथमिक निरीक्षण असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच दुसरा एक गट आहे जे परिक्षा लवकरात लवकर घ्याव्यात यासाठीही मागणी करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp