Maharashtra Live: त्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही; अजित पवारांना संताप अनावर

मुंबई तक

आभाळ फाटलं म्हणून शेतकऱ्याचं नशीब फाटलं -धनंजय मुंडे विधानसभेत स्थगन प्रस्तावावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, संबंध देशात नाहीतर जगात उघड्या आभाळाखाली व्यवसाय करणारी एकमेव जात आहे, त्या जातीचं नाव शेतकरी आहे. ही शेतकऱ्याची जात प्रत्येक वेळी नैसर्गिक आणि आस्मानी संकटात आलेली आहे. आता आपलं अधिवेशन चालू असताना मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या सर्व परिसरातील सर्व […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आभाळ फाटलं म्हणून शेतकऱ्याचं नशीब फाटलं -धनंजय मुंडे

विधानसभेत स्थगन प्रस्तावावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, संबंध देशात नाहीतर जगात उघड्या आभाळाखाली व्यवसाय करणारी एकमेव जात आहे, त्या जातीचं नाव शेतकरी आहे. ही शेतकऱ्याची जात प्रत्येक वेळी नैसर्गिक आणि आस्मानी संकटात आलेली आहे. आता आपलं अधिवेशन चालू असताना मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या सर्व परिसरातील सर्व पिकं घेणारा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यांची पूर्ण पिकं उद्ध्वस्त झाली आहेत.

आभाळ फाटलं म्हणून शेतकऱ्याचं नशीब फाटलं आहे. विरोधी पक्षनेत्यांनी स्थगन दिला. माझी विनंती आहे, परिस्थिती इतकी गंभीर आहे की, एका जिल्ह्यात, परभणी जिल्ह्यात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. असंख्य पशुधन गेलं आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मागचं अनुदान एक रुपयाही मिळालेलं नाही. इतकी वाईट अवस्था आहे. उदाहरण द्यायचं असेल, तर बीड जिल्ह्याचं देऊ शकतो.

सरकार अनुदान जाहीर करत पण, शेतकऱ्याच्या खात्यावर येत नाही. म्हणून माझी विनंती आहे की, आजचं सर्व कामकाज बाजूला ठेवून गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं, मनुष्यांचं आणि पशुधनाचं जे नुकसान झालं आहे, त्यावर चर्चा झाली पाहिजे”, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

त्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही; अजित पवारांचा सभागृहात संताप

विधानसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झालेलं नुकसान आणि कर्मचाऱ्यांच्या संपावरून सरकारला सुनावलं. यावेळी त्यांनी अध्यक्षांकडे आदेश काढण्याची मागणी केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp