सरकारने मनावर दगड ठेवून Lockdown केला आहे, लोकांना कळकळीची विनंती आहे की…

मुंबई तक

महाराष्ट्र सरकारने मनावर दगड ठेवून आत्ताचा पंधरा दिवसांचा लॉकडाऊन केला आहे. मी सगळ्या जनतेला कळकळीची विनंती करतो आहे की हा लॉकडाऊ यशस्वी करून दाखवा नाहीतर परिस्थिती आणखी बिकट होत जाईल असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुंबई तकशी संवाद साधत असताना राजेश टोपे यांनी हे आवाहन केलं आहे. माणसाचा जीव वाचवणं हे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्र सरकारने मनावर दगड ठेवून आत्ताचा पंधरा दिवसांचा लॉकडाऊन केला आहे. मी सगळ्या जनतेला कळकळीची विनंती करतो आहे की हा लॉकडाऊ यशस्वी करून दाखवा नाहीतर परिस्थिती आणखी बिकट होत जाईल असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुंबई तकशी संवाद साधत असताना राजेश टोपे यांनी हे आवाहन केलं आहे. माणसाचा जीव वाचवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आपण सगळ्यांनी एकजुटीने कोरोनाशी लढा दिला पाहिजे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

लॉकडाऊन हा काही फक्त आपल्याच राज्यात झालेला नाही. जगभरातल्या देशांमध्ये लॉकडाऊन करावा लागला आहे. युकेमध्ये तर तीनवेळा लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊन केला की लोक घरात थांबतात आणि कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होते. जर कोरोनामध्ये म्युटेशन बदललं असेल तर आम्ही ट्रिटमेंटची पद्धत बदलायला हवी का? याचीही माहिती आम्हाला या संस्थेने द्यावी.

अनेकांना लॉकडाऊन पटलेला नाही. आम्हालाही लॉकडाऊन लावण्याची हौस मुळीच नाही. लॉकडाऊन लावल्याने संसर्ग रोखण्यास मदत होते. अर्थचक्र थांबलं तरीही चालेल मात्र लोकांचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे. लोकांचा जीव वाचवणं ही प्राथमिकता आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

27 हजार रेमडेसिवीर येतात, मग जातात कुठे? गुजरात सरकारला हायकोर्टाने झापलं

हे वाचलं का?

    follow whatsapp