Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टातील 12 मुद्दे ठरवणार ठाकरेंचं भवितव्य!

मुंबई तक

Supreme Court Hearing On Maharashtra Political Crisis। kapil sibal Arguments। constitutional bench of supreme court : ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आज संपला. मंगळवारी दिवसभर आणि बुधवारी दुपारपर्यंत कपिल सिब्बल अनेक मुद्द्यांकडे सुप्रीम कोर्टाचं लक्ष वेधलं. सिब्बल यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला विचारणा केली की, आम्ही कोणत्या मुद्द्यांवर निर्णय घ्यायला, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Supreme Court Hearing On Maharashtra Political Crisis। kapil sibal Arguments। constitutional bench of supreme court : ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आज संपला. मंगळवारी दिवसभर आणि बुधवारी दुपारपर्यंत कपिल सिब्बल अनेक मुद्द्यांकडे सुप्रीम कोर्टाचं लक्ष वेधलं. सिब्बल यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला विचारणा केली की, आम्ही कोणत्या मुद्द्यांवर निर्णय घ्यायला, असं तुम्हाला वाटतं. त्यावर कपिल सिब्बलांनी 12 मुद्द्यांवर निर्णय घेणे आवश्यक असल्याचं न्यायालयाला सांगितलं.

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं की, पक्षप्रमुख म्हणून शिवसेनेचे निर्णय घेण्याचे अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणीने उद्धव ठाकरेंना दिले होते. एकनाथ शिंदे यांची नेते म्हणून उद्धव ठाकरेंनीच नियुक्ती केली होती. नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या बैठकीत झालेल्या ठरावात निर्णयाचे सर्वाधिकार ठाकरेंकडे दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी, तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांची निवड आमदारांनी केली होती, असं सिब्बल यांनी सांगितलं.

कपिल सिब्बल यांनी या प्रकरणातील प्रमुख मुद्द्यांवर युक्तिवाद केल्यानंतर न्यायमूर्ती नरसिंहा यांनी त्यांना विचारणा केली की, आम्ही कोणत्या मुद्द्यांवर निर्णय घ्यायला असं तुम्हाला वाटतं?

Sharad Pawar: ‘तर ठाकरे मुख्यमंत्रीच झाले नसते’, पहाटेच्या शपथविधीबद्दल पवारांनीच केला गौप्यस्फोट

हे वाचलं का?

    follow whatsapp